AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...तर बंदोबस्त केला पाहिजे! कॉम्रेड प्रकाश रेड्डींचा इशारा

…तर बंदोबस्त केला पाहिजे! कॉम्रेड प्रकाश रेड्डींचा इशारा

| Updated on: Oct 19, 2025 | 4:54 PM
Share

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत मोठ्या त्रुटी आणि गैरव्यवहारांचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी बोगस मतदार याद्यांद्वारे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. १ नोव्हेंबर रोजी याविरोधात मोर्च्याची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी आणि गैरव्यवहार असल्याचा आरोप केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना रेड्डी यांनी सांगितले की, पक्षीय शिष्टमंडळाने यादीतील अनेक बोगस नोंदी, एकाच मतदाराचे नाव अनेक ठिकाणी असणे, तसेच एका जागेवर मोठ्या संख्येने मतदार नोंदवल्याचे मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडले होते. मात्र, आयोगाने दिलेला खुलासा असमाधानकारक आणि खोटा असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी मतदार यादीत सुधारणा आवश्यक असल्याचे रेड्डी यांनी नमूद केले. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार निवडणुका जिंकण्यासाठी बोगस याद्या तयार करून मतदार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा महाराष्ट्रात बंदोबस्त होणे गरजेचे आहे. या गैरप्रकारांविरोधात १ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी होईल, अशी घोषणा त्यांनी केली.

Published on: Oct 19, 2025 04:54 PM