AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’

जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’

| Updated on: Aug 14, 2026 | 11:24 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाल्याचं सांगत, वैयक्तिक व्यंग किंवा कुटुंबीयांवर टीका करणं योग्य नसल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सातत्याने चर्चा सुरू असून, 14 एसओपींपैकी जवळपास 10 ते 11 कामं पूर्णत्वाकडे गेल्याचा दावा लाड यांनी केला. आंदोलकांनी आक्रमक राहावं, मात्र ही आक्रमकता विषयापुरती मर्यादित […]

मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावुक झाल्याचं सांगत, वैयक्तिक व्यंग किंवा कुटुंबीयांवर टीका करणं योग्य नसल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सातत्याने चर्चा सुरू असून, 14 एसओपींपैकी जवळपास 10 ते 11 कामं पूर्णत्वाकडे गेल्याचा दावा लाड यांनी केला. आंदोलकांनी आक्रमक राहावं, मात्र ही आक्रमकता विषयापुरती मर्यादित असावी आणि ती भरकटता कामा नये, अशी विनंतीही त्यांनी जरांगे पाटील यांना केली.

दरम्यान, मनोज जरांगे सध्या दौऱ्यावर असून 17 तारखेनंतर अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. बावनकुळे यांच्याबाबत जरांगेंचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published on: Aug 14, 2026 11:24 AM

Follow Us