Video : “ईडीचा गैरवापर होतोय, सभागृहात चर्चा व्हावी”, प्रियंका चतुर्वेदींचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना […]
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरूपयोगावर चर्चा घ्यावी यासाठी प्रियांका पत्र लिहिलं आहे. ईडी, सीबीआय, आयटीचा देशात दुरूपयोग होत असल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केला आहे. इतर विषय सस्पेंड करून यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. अश्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचं विरोधीपक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. तर ज्यांची भ्रष्टचार केलाय त्यांना शिक्षा होणारच, असं भाजप आणि शिंदेगटातील नेते म्हणत आहेत. त्यावर चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Latest Videos
Latest News