Pune Rising Crime: नाशकात गुंडाची धुलाई मग पुण्यात कुणामुळे दिरंगाई? पुढारी गप्प का? का होतेय नाशिक पॅटर्न चर्चा?
पुण्यात गुन्हेगारी वाढली असून महिला असुरक्षित आहेत. नाशिकमध्ये गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना दिलेला ‘फ्री हँड’ पुण्यात का नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि हस्तक्षेपामुळे पुण्यात नाशिक पॅटर्न राबवला जात नसल्याचा सूर उमटत आहे, यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे.
पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढताना दिसत आहे, ज्यामुळे नागरिक, विशेषतः महिला व्यावसायिक, असुरक्षित झाल्या आहेत. वारजेसारख्या परिसरात मंगळसूत्र आणि चेन खेचून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच संदर्भात सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत पोलीस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांना चाप लावण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये गुंडांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी यशस्वीपणे मोहीम राबवली आहे, ज्यात त्यांना सरकारने ‘फ्री हँड’ दिला आहे. मात्र, पुण्यातही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी टोळ्या असूनही, नाशिकसारखा पॅटर्न का राबवला जात नाही, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी गुन्हेगार कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांची गय केली जाणार नाही, असे म्हटले आहे. परंतु, पुण्यात राजकीय नेत्यांकडून हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याची चर्चा आहे.
Published on: Oct 15, 2025 11:27 AM
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
