AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधन : भारताला पुढे नेणाऱ्या ट्रकचालकांना कृतज्ञतेची पत्रे

रक्षाबंधन : भारताला पुढे नेणाऱ्या ट्रकचालकांना कृतज्ञतेची पत्रे

| Edited By: | Updated on: Aug 10, 2025 | 12:38 PM
Share

टाटा मोटर्स जमशेदपूर प्लांटमध्ये रक्षाबंधन केवळ साजरेच केले जात नाही—ते इथे मनापासून अनुभवले जाते. यावर्षी, भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि सुरक्षित ट्रक तयार करणाऱ्या ‘दुर्गा लाईन’मधील महिलांनी, कधीही भेट न झालेल्या ट्रक चालक बंधूंना—त्यांच्या ‘अनोळखी भावांना’—हाताने लिहिलेली पत्रे पाठवली.

‘रक्षा का बंधन – टाटा ट्रक्स, देश के ट्रक्स’ या उपक्रमामार्फत ही पत्रे फॅक्टरीच्या भिंती पार करत भारताच्या महामार्गांवर पोहोचली—कृतज्ञता, सन्मान आणि शुभेच्छा घेऊन. ही पत्रे लिहिणाऱ्या महिलांसाठी हे चालक केवळ वाहनचालक नाहीत—ते असे शांत बंधू आहेत, जे प्रत्येक मार्गावर देशाच्या आशा वाहून नेतात.

प्रत्येक राखीबरोबर एक पत्र पाठवले गेले. प्रत्येक पत्र हे उत्पादन लाइनवरील एक आवाज होता—जो क्रॅश-टेस्टेड आणि सुरक्षित अल्ट्रा, सिग्ना आणि प्राइमा ट्रक्स बनवण्यामध्ये मनापासून गुंतलेला आहे. प्रत्येक शब्द, चेहरा नसतानाही पोहचणाऱ्या काळजीचा एक प्रतिध्वनी होता.

या उपक्रमाद्वारे, टाटा मोटर्स केवळ त्यांच्या ट्रक्सची ताकद व सुरक्षितता साजरी करत नाही, तर त्यांच्या लोकांची ताकदही साजरी करते—ते बनवणारे आणि चालवणारे, जे विश्वास आणि कर्तव्याच्या नात्याने एकत्र जोडलेले आहेत.

रक्षा का बंधन – टाटा ट्रक्स, देश के ट्रक्स
टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स – नेहमीच उत्तम.

Published on: Aug 09, 2025 05:04 PM