AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Barsu Refinery : नितेश राणेंच्या दाव्याला ठाकरे गटाच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले, ...लोकचं

Barsu Refinery : नितेश राणेंच्या दाव्याला ठाकरे गटाच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले, …लोकचं

| Updated on: May 06, 2023 | 8:39 AM
Share

रिफायनरीच्या मुद्यावरून आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई : रत्नागिरीतील बारसू सोलगाव (Barsu Refinery) येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण आणखी पेटणार आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून (Ratnagiri Refinery)आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, याच दिवशी रिफायनरी समर्थक हे देखिल मोर्चा काढणार आहेत. यावेळी 25 ते 30 हजार रिफायनरी समर्थक मोर्चात सहभागी असतील तर नारायण राणे आणि उदय सामंत यावेळी मार्चात असतील असे असा दावा राणे यंनी केला आहे. नितेश राणे यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पलटवार करताना राणे यांनी बारसू सोलगाव येथे जावं. त्यांना लोकचं मारून हाकलून देतील असा घणाघात केला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा कोकणातील राजकीय तापमान हे वाढणारा ठरणार आहे.

Published on: May 06, 2023 08:39 AM