Barsu Refinery : नितेश राणेंच्या दाव्याला ठाकरे गटाच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले, …लोकचं
रिफायनरीच्या मुद्यावरून आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई : रत्नागिरीतील बारसू सोलगाव (Barsu Refinery) येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण आणखी पेटणार आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून (Ratnagiri Refinery)आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, याच दिवशी रिफायनरी समर्थक हे देखिल मोर्चा काढणार आहेत. यावेळी 25 ते 30 हजार रिफायनरी समर्थक मोर्चात सहभागी असतील तर नारायण राणे आणि उदय सामंत यावेळी मार्चात असतील असे असा दावा राणे यंनी केला आहे. नितेश राणे यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पलटवार करताना राणे यांनी बारसू सोलगाव येथे जावं. त्यांना लोकचं मारून हाकलून देतील असा घणाघात केला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा कोकणातील राजकीय तापमान हे वाढणारा ठरणार आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
