AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, 'सामना'तून महायुती सरकारवर हल्लाबोल

Saamana : राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, ‘सामना’तून महायुती सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Dec 29, 2025 | 12:31 PM
Share

सामनाच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात गुंडांनी प्रवेश केल्याचा आरोप सामनाने केला. महाराष्ट्रात गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले असून, राज्यात गुंडाराज सुरू झाल्याचे यात म्हटले आहे. गृहखात्याच्या निष्क्रियतेमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचेही अग्रलेखात नमूद केले आहे.

सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून महायुती सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस आले असून, शिवरायांच्या महाराष्ट्रात गुंडाराज सुरू झाल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षात गुंडांनी प्रवेश केल्याचा दावा सामनाने केला आहे. या अग्रलेखात नमूद केले आहे की, महाराष्ट्र हा गुंडांचा पोशिंदा बनला आहे. सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये गुंड टोळ्यांचा भरणा आहे आणि या टोळ्या एकमेकांविरुद्ध लढत आहेत. गृहखाते निष्क्रिय असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सामनाने मंगेश काळोखेंची हत्या, गोगवले यांचा गुंड पुत्र फरार असणे आणि सातारच्या ड्रग्ज फॅक्टरीचे रूपांतर मिठाईच्या दुकानात झाल्याचे आरोप उदाहरण म्हणून दिले आहेत. महाराष्ट्राला रक्तपाताने भिजवल्याचा आरोपही सामनाने सरकारवर केला आहे.

Published on: Dec 29, 2025 12:31 PM