Sadabhau Khot | दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत, सदाभाऊ खोत यांचं टीकास्त्र
पवार साहेब म्हणत्यात आर्यन खानने गांजा ओढला नाही. तो हर्बल गांजा आहे. तो आम्हला द्या आम्ही ही श्रीमंत होऊ. गांजा तुम्ही आणला आम्ही नाही. तर हे राज्य वसुलीखोरांचे गांजाडांचे आहे. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर येथे विविध उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
या दोन वर्ष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. मात्र हे सार मंत्रीमंडळ आर्यन खानच्या मागे आहे. हे राज्य वसुलीखोरांचे गांजाडांचे आहे, असा घणाघात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केलाय. पवार साहेब म्हणत्यात आर्यन खानने गांजा ओढला नाही. तो हर्बल गांजा आहे. तो आम्हला द्या आम्ही ही श्रीमंत होऊ. गांजा तुम्ही आणला आम्ही नाही. तर हे राज्य वसुलीखोरांचे गांजाडांचे आहे. अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर येथे विविध उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
या तीन पक्षाचे सरकार कुणाचं काय चाललंय हे कळत नाही. या दोन वर्ष्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत. या दोन वर्ष्यात दोन महिने सुद्धा मंत्रालयात गेले नाहीत. वर्षा बांगला तर ओस पडला आहे. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा ते मंत्रालयात आमदारासाठी कायम उपस्थित असायचे. वर्षा बंगला तर पहाटे चार वाजल्यापासून सुरू असायचं. मात्र हे सार मंत्रीमंडळ आर्यन खानच्या माग आहेत.
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

