Sambhaji Bhide : ना पुरुष ना स्त्री हा नीचपणा… आंबा खाल्यानं मुलं होतात म्हणणारे भिडे आता नेमकं काय म्हणाले?
संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत वादाची मालिका कायम ठेवली. सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा असल्याचं भिडे म्हणालेत. तसंच त्यांनी आंब्याच्या वक्तव्याचाही पुनरुच्चार केलाय.
कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी वाद निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांनी पुन्हा वाईट वायफळ केली. नाशिकमध्ये व्याख्यान देताना भिडे यांनी वादाची मालिका कायम ठेवत सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा असं म्हटलंय. सर्वधर्म समभाव हा निखळ ना पुरुष ना स्त्री असा प्रकार नपुंसकपणा नीचपणा आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू पण लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा. सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जंदने सांगितलं ते काम करू. खग्रास ग्रहणाच्या काळात जो मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची जन्मोजन्मी शक्ती मिळते.
याआधी आंब्याच्या वक्तव्यावरून भिडे यांनी वाद ओढवून घेतला होता. त्याचा पुनरुच्चारही भिडेंनी यावेळी केलाय. ‘मी बोललो होतो आंबे खाऊन मुलं होतात. त्यासंदर्भात माझ्या विरोधात कोर्टात केस सुरू आहे. मी एक झाड लावलय आंब्याचं तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता.’, असं भिडे म्हणाले. आंब्याच्या वक्तव्यावरून शिंदेंचे मंत्री सरनाईक यांनीही त्यांच्याच भाषेत टोला लगावला. ‘मी आज सीजन नसताना सुद्धा भरपूर सकाळी आंबे खाल्लेत.’, असं सरनाईक म्हणाले. कधी कोरोना झालेल्यांना भिडे शिव्या देतात तर कधी हिंदूंनाच महामूर्ख म्हणतात. आणि एकदा टीकेचा भडिमार होऊनही संभाजी भिडे मात्र आपल्या वक्तव्यांना लगाम देतना दिसत नाहीत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

