Sanjay Raut : …तर त्यांनी विड्या वळत बसावं, तो त्यांचा खानदानी बिझनेस, ‘त्या’ टीकेवरून राऊतांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा
प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेतकरी मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर संजय राऊत यांनी, "पहिल्याच कॅबिनेटमध्ये ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली," असे प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी पटेल यांना या माहितीसाठी विड्या वळत बसावे असे सुनावले, त्यांच्या राजकीय ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रफुल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील नैसर्गिक आपत्तींवरून शेतकऱ्यांना केलेल्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किती मदत केली? असा सवाल पटेल यांनी विचारला होता. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले.
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचे दोन ते अडीच लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. शेतकरी आजही त्या कर्जमाफीची आठवण काढत असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. जर प्रफुल्ल पटेल यांना या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती नसेल, तर त्यांनी विड्या वळत बसावे, असा उपरोधिक सल्ला राऊत यांनी दिला. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याचेही राऊत म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

