AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak Kesarkar : बाळासाहेब कधी कोणी सोडून गेला म्हणून असं बोलत नव्हते, केसरकर यांचा ठाकरे यांच्यावर निशाणा

Deepak Kesarkar : बाळासाहेब कधी कोणी सोडून गेला म्हणून असं बोलत नव्हते, केसरकर यांचा ठाकरे यांच्यावर निशाणा

| Updated on: Mar 06, 2023 | 1:35 PM
Share

उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील जाहीर सभेनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्वव ठाकरे यांना दम भरला आहे. तसेच खरं सत्य जनतेला सांगा आणि मग बघा जनताच तुमचं काय करते असंही त्यांनी म्हटलं आहे.

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : उद्वव ठाकरे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटं बोलून फसवलत. हे तरी जनतेला सांगा. तुम्ही हे सत्य जनतेला सांगा आणि मग बघा जनताच तुमचं काय करते ते असा दमच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्वव ठाकरे यांना भरला आहे. उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांचवेळी शिंदेंसह त्यांनी शिंदेबरोबर गेलेल्या नेत्यांवरही टीका केली होती. त्याला केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. तर बाळासाहेब कधी कोणी सोडून गेला म्हणून जाणाऱ्यांना कोल्हे, लांडगे म्हणत नव्हते असं ही सुनावलं आहे. तर उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत मुख्यमंत्री रहा असं म्हटल्याचे त्यांनी सांगतलं. मात्र उद्धव ठाकरे यांना राहुल गांधी आणि शरद पवार यांचा ओव्हर कॉफिडन्स नडल्याची टीका देखिल केसरकर यांनी केली.

Published on: Mar 06, 2023 01:35 PM