इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर खालापुरात कलम 144 लागू; काय कारण?
त्याचबरोबर बचावकार्यासाठी आणखीन 4 तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता पावसामुळे बचावकार्याला वेग येताना दिसत नाही. त्याचच आता मृतप्राण्यांची दुर्गंधी सुटू लागली आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही येथे मदत आणि बाचवकार्य सुरू आहे. त्याचबरोबर बचावकार्यासाठी आणखीन 4 तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता पावसामुळे बचावकार्याला वेग येताना दिसत नाही. त्याचच आता मृतप्राण्यांची दुर्गंधी सुटू लागली आहे. त्याचवेळी, इर्शाळवाडीवर मदतीसाठी येणारे ट्रेकर्स, सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दीही वाढताना दिसत आहे. तर अनेकजण निव्वळ कुतूहलापोटी येथे जाऊन गर्दी करत आहेत. ज्यामुळे येथे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून यावर कडक पावले उचलली जात आहेत. तर मदतकार्यात नेमलेल्या व्यक्तींशिवाय इतरांना गडावर जाण्यास रविवारपासून पुढील पंधरा दिवस बंदी घालण्यात आली असून येथे कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

