अजितदादांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यातील शरद पवार यांनी हवाच काढली अन् विश्वासार्हतेवरच केला सवाल
कर्जत येथील मेळाव्यातून अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट करून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र २४ तासांच्या आतच शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केले आहे. बघा काय म्हणाले शरद पवार?
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : कर्जत येथील मेळाव्यातून अजित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट करून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र २४ तासांच्या आतच शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर सवाल उपस्थित केले आहे. अजित पवार सत्य बोलतात हे कशावरून? असा सवाल उपस्थित केलाय. अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, सरकारमध्ये जा…असं शरद पवार यांनी सांगितल्याचे म्हणत अजितदादांनी एकच खळबळ उडवली आहे. मात्र अजित पवार यांच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी असताना २००४ पासून भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांना सांगितलं आणि युती होऊ शकली नाही. असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार

