AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मंत्रालयात गरजणार शिवपराक्रम गाथा; सरकारचा मोठा निर्णय

आता मंत्रालयात गरजणार शिवपराक्रम गाथा; सरकारचा मोठा निर्णय

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Aug 09, 2023 | 2:03 PM
Share

आजपासून दररोज मंत्रालयात शिवरायाच्या विचारांची आणि पराक्रमाची ध्वनिफीत लागणार आहे. या ध्वनिफीतीत 2 ते 3 मिनिटात शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे.

मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून दररोज मंत्रालयात शिवरायाच्या विचारांची आणि पराक्रमाची ध्वनिफीत लागणार आहे. या ध्वनिफीतीत 2 ते 3 मिनिटात शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाणार आहे. तर मंत्रालयात रोज सकाळी 10: 45 वाजता शिवरायांचे विचार ऐकवले जाणार आहेत. कर्मचारी, अधिकारी आणि तिथे आलेल्या अभ्यगतांना विचार ऐकवले जाणार आहेत. माझी माती, माझा देश या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published on: Aug 09, 2023 01:34 PM
Follow Us