AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग सामानाची का दखल घेता...

मग सामानाची का दखल घेता…

| Updated on: Aug 15, 2022 | 2:15 PM
Share

सामनावर आशिष शेलार यांनी टीका करताना सामना म्हणजे कागदाचा लगदा आहे असं म्हटले होते, त्यावर बोलताना त्यानी सांगितले की, तुम्हाला सामना लगदा वाटत असले तर त्याला का महत्व देता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

सामनामधून जे छापून येते ते सत्याचं असते, त्यामुळेच कालच्या मंत्रिमंडळावर जी टीका करण्यात आली आहे ती योग्यच असल्याचे मत शिवेसेनेचे आमदार अंबादास दानवे मांडले. गुलाबरावर पाटील यांनी सामनावर टीका करताना म्हणाले आहेत की, सामना म्हणजे उंदाराला सापडेली चिंधी आहे, त्यावरही मत व्यक्त करताना दानवे यांनी पलटवार मारत खरी चिंधी ही गुलाबराव पाटीलच आहेत.  कारण दोन महिन्यापूर्वी ज्या शिवसेनेविषयी बोलत होते, त्यांची भाषणं तपासली म्हणजे कळेल कोण खरं आणि कोण खोट हे कळून येईल असंही ते म्हणाले. तर सामनावर आशिष शेलार यांनी टीका करताना सामना म्हणजे कागदाचा लगदा आहे असं म्हटले होते, त्यावर बोलताना त्यानी सांगितले की, तुम्हाला सामना लगदा वाटत असले तर त्याला का महत्व देता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Aug 15, 2022 02:15 PM