AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं, संजय राऊतांचं वक्तव्य

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं, संजय राऊतांचं वक्तव्य

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 12:38 PM
Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन जात आहेत. देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचमध्ये येत आहे, त्यामुळं विरोधकांचं दु: ख मी समजू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रापुढं अनेक प्रश्न आहेत त्यावर काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन जात आहेत. देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव पहिल्या पाचमध्ये येत आहे, त्यामुळं विरोधकांचं दु: ख मी समजू शकतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं महाराष्ट्राच्या हिताचं आहे. शिवसेना प्रमुखांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत कोणीही पाठीत खंजीर खुपसलेला नाही.बंद दाराआड काय झालं होतं आणि तिथून काय घडलं यात जास्त खोलात जायला नको. महाराष्ट्राच्या जनतेला आता मदतीची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

 

Published on: Sep 02, 2021 12:36 PM