AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मुंबईकरांच्या करमाफीवरुन हंगामा! भाजप-शिवसेना आमनेसामने

Special Report | मुंबईकरांच्या करमाफीवरुन हंगामा! भाजप-शिवसेना आमनेसामने

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 11:12 PM
Share

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई'करां'ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई’करां’ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

आशिष शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यातबरोबर त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणीही केली आहे. आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत.