AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 September 2022 -TV9

100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 29 September 2022 -TV9

| Updated on: Sep 29, 2022 | 10:12 AM
Share

भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे देशहिताचं असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. यानंतर सुश्मा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना, ते अर्धवटराव असल्याचे म्हटलं आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी या निकालामुले अनेकांचे धाबे दणानल्याचे म्हटलं आहे. तसेच आता दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा असेही ते म्हणाले. तर ठाण्यातील ठाण्यातील ठेंबी नाक्यावर देवाची जागर शिवसेनेकडून आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात येणार आहे. तर दसरा मेळाव्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. दसरा मेळाव्यात आमची ताकद दिसेल. तर खोके सरकार आल्यापासून त्यांच्या वागण्यातूनच त्यांची संस्कृती दिसते असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हे देशहिताचं असल्याचं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. यानंतर सुश्मा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना, ते अर्धवटराव असल्याचे म्हटलं आहे.

 

Published on: Sep 29, 2022 10:12 AM