मुंबईकरांची चिंता मिटली; सात धरणात 68 टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा; पाणीकपात हटणार?
कोकण पट्ट्यासह मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यात धुंवाधार पाऊस होत आहे. तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकिकडे मुसळधार पावसामुळे शेत पीकांना फटका बसत अशतानाच आता मुंबईसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
मुंबई, 29 जुलै 2023 | मागील काही दिवसांपासून राज्यातील कोकण पट्ट्यासह मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यात धुंवाधार पाऊस होत आहे. तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकिकडे मुसळधार पावसामुळे शेत पीकांना फटका बसत अशतानाच आता मुंबईसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता मुंबईकरांची होणारी पाणीकपात थांबणार आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून मुसळधार, अतिमुसळधार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात सध्या 68 टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता मिटली आहे. हा पाणीसाठी आता 2024 पर्यंत पुरेल इतका आहे. Water shortage
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

