उद्धव ठाकरे गटाची ‘ती’ मागणी मान्य होणार का? काय होणार आज सर्वोच्च न्यायालयात ?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला आहे. तर आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद केला आहे. तर आज शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करणार आहेत. काल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने शिवसेनेच्या फुटीवर निर्णय घेणं हा मोठा कठिण संवैधानिक मुद्दा असल्याचे मौखिकरित्या म्हटले होते. तर, ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या घटना पीठाकडे सोपविण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या या मागणीवर न्यायालय काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे. सकाळी १०.३० वाजता हि सुनावणी सुरु होणार आहे.
Published on: Feb 16, 2023 10:10 AM
Follow Us
Latest Videos
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

