AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना आरक्षण द्या : संजय निरुपम

मुंबई : महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनाही आरक्षण द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. यासंदर्भात मागणी करताना संजय निरुपम यांनी स्पष्ट केले की, ” आमच सरकार होतं, तेव्हा आम्ही उत्तर भारतीयांना आरक्षण दिलं नाही, ही आमची चूक ठरली. मात्र, सर्व उत्तर भारतीयांना आरक्षण द्या, असेही मी म्हणत नाही.” जात एकच पण वेगळ्या […]

महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना आरक्षण द्या : संजय निरुपम
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात उत्तर भारतीयांनाही आरक्षण द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. यासंदर्भात मागणी करताना संजय निरुपम यांनी स्पष्ट केले की, ” आमच सरकार होतं, तेव्हा आम्ही उत्तर भारतीयांना आरक्षण दिलं नाही, ही आमची चूक ठरली. मात्र, सर्व उत्तर भारतीयांना आरक्षण द्या, असेही मी म्हणत नाही.”

जात एकच पण वेगळ्या आडनावांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यावर तोडगा काढायला हवा, असेही संजय निरुपम यांनी म्हटले.

‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ कार्यक्रमात संजय निरुपम, भाई जगताप, नितेश राणे, शायना एनसी हजर होत्या. त्यांनी आरक्षणासह राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली.

संजय निरुपम यांना नितेश राणेंचे उत्तर

उत्तर भारतीय महाराष्ट्रात येऊन आरक्षण मागू लागले, तर मग इथल्या मराठी माणसाने जायचं कुठं? सर्वात आधी इथल्या स्थानिकांचा अधिकार आहे, असे नितेश राणे यांनी संजय निरुपम यांनी उत्तर दिले. तसेच, आधी स्थानिकांचा विचार करा, मग संघर्ष होणार नाही, असेही नितेश राणेंनी म्हटले.

ओबीसींनी घाबरायचे कारण नाही : नितेश राणे

“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल का, असा प्रश्नच विचारणे बंद करा. त्या प्रश्नाने संशय निर्माण होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी समाजाने घाबरायचं कारण नाही, मराठा आरक्षणाने कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही.”, असे नितेश राणे यांनी सांगितले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.