Maharashtra News LIVE : नाशकात घटनास्थळी पोहोचले मंत्री नरहरी झिरवाळ..
Maharashtra News LIVE Updates : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागाना झोडलं असून शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली, पाऊस तसेच गारपीट यामुळे शेतीपिकांचही मोठं नुकसान झालंय. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे ताजे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळीतली. पॉलो करा टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग...

LIVE NEWS & UPDATES
-
स्थानिक पातळीवर वाद मिटवला ही चांगली गोष्ट झाली- जरांगे पाटील
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. वाद होईल अश्या ठिकाणी महाराजांचे पुतळेच बसवूचं नका ;जरांगे पाटील. पुतळे कोण विकत होत याचा शोध घेतला पाहिजे. वाद मिटल्यानंतर आता त्या ठिकाणी जाण्याची अवशकता नसल्याची जरांगे यांची प्रतिक्रिया
-
डोंबिवलीत ‘CBI’च्या नावाखाली 71 लाखांचा डल्ला! ‘डिजिटल अरेस्ट’चा सापळा
डोंबिवलीत ‘CBI अधिकारी’ बनून 71 लाखांची फसवणूक. घाटकोपर पोलिसांत तक्रार असल्याचा खोटा बनाव करत “तपास CBI करत आहे” सांगत नागरिकाला जाळ्यात ओढले. अटकेची भीती आणि ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवून लूट सुप्रीम कोर्टाचे बनावट आदेश पाठवून विश्वास संपादन करत. टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली
-
-
नाशकात कार विहिरीत घटनास्थळी मंत्री झिरवाळ…
नाशकात धक्कादायक घटना घडली. नाशकात थेट कार विहिरीमध्ये कोसळले, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. आता घटनास्थळी नरहरी झिरवाळ हे पोहोचले आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये SRPF च्या भरती प्रक्रिया सुरू
भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवाराची कॅम्पमध्येच करण्यात आली राहण्याची व जेवण्याची निशुल्क व्यवस्था. SRPF च्या 291 जागेच्या भरतीसाठी 75 हजार उमेदवारी मैदानात. एसआरपीएफ चा नवीन गट आहे गट क्रमांक 20 वरणगाव जिल्हा जळगाव त्या गटाची ही भरती आहे.
-
नाशिक – दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नाशिक – दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री 10 दहा वाजता खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन झाल्यानंतर घरी परतताना अपघात झाला , ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला.
दिंडोरी येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला लागूनच विहीर आहे. जिथे रस्ता संपतो तिथे3 फुटावर रस्त्याच्या समोरच विहीर असल्याने कार डायरेक्ट विहिरीत पडून अपघात झाला होता.
-
-
पंढरपूर – शेकडो वर्ष जुना असलेल्या यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी
शेकडो वर्ष जुना असलेल्या पंढरपुरातील यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. परिसरातील मैला मिश्रित सांडपाणी या तलावात येत असल्याने पाणी प्रदूषित होऊन मासे मृत्युमुखी पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यमाई तलावातील पाणी प्रदूषित झाल्याने परदेशी पक्ष्यांच्या जीवा बरोबर परिसरातील नागरिकांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
-
नांदेड मध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू,
नांदेड मध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून गँग वॉर असल्याची चर्चा आहे. कॅनाल रोडवर मध्यरात्री उशिरा ही घटना घडली. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम सह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून तपास सुरू आहे. यातील एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू उर्वरित तिघांचा दवाखान्यात मृत्यू झाला.
-
-
अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावालाही अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे बागेतील संत्र्याची झाडे उन्मळून पडली. तसेच शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्र्याचही नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल आहे.
-
बीड – सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पावसाने झोडपलं
गेल्या चार दिवसांपासून सतत झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याला झोडपून काढलं. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी ओढे पाण्याने प्रवाहित झाल्याचं दिसून आले. जिल्ह्यातील बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळी सह गारपिटीचा तडाखा बसला. काल सायंकाळी आणि रात्री उशिरा झालेल्या पावसाने वडवणी तालुक्यातील मनकर्णिका नदी प्रवाहित झाली होती. तर ताडसोन्ना येथील ओढ्याला देखील पाणी आले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पावसाने ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागेचे नुकसान झाले. तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील 237 हेक्टरवर असलेल्या पिकांना पावसाचा फटका बसला.
-
सांगली – राम मंदिर चौकात बसण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला
सांगली शहरातील राम मंदिर चौकामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा अखेर हटवण्यात आला आहे. सांगली शहरातील शंभू प्रेमींनी पहाटे राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली होती. याची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने राम मंदिर चौकात धाव घेतली. चर्चेनंतर अखेर राम मंदिर चौकात बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मात्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सांगली शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
सलग चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याला झोडपून काढलं. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी ओढे पाण्याने प्रवाहित झाल्याचं दिसून आले. जिल्ह्यातील बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला अवकाळी सह गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी पावसाने ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागेचे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची सतत हजेरी लागली असून शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. यामध्ये एक नर आणि एक मादी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही बिबट्यांना एकाच पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आलं. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपेड्टस वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Apr 04,2026 8:59 AM
