AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Pump: राज्य सरकारचा असा शॉक… शेतकऱ्यांना तेलंगणाच्या सीमेलगतच घ्यावी लागली जमीन, काय आहेत कारणं?

राज्यात सातत्याने कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा असा काय परिणाम झाला आहे त्याचा विचारही कोणी केला नसेल. यंदा तर ऐन रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने याची झळ अधिक तीव्र होती. आतापर्यंत कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप इथपर्यंतचेच परिणाम आपल्याला माहिती होते. मात्र, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेली माहिती फार धक्कादायक आणि राज्यासाठी लाजिरवाणी आहे.

Agricultural Pump: राज्य सरकारचा असा शॉक... शेतकऱ्यांना तेलंगणाच्या सीमेलगतच घ्यावी लागली जमीन, काय आहेत कारणं?
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 25, 2022 | 5:34 PM
Share

मुंबई : राज्यात सातत्याने (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा असा काय परिणाम झाला आहे त्याचा विचारही कोणी केला नसेल. यंदा तर ऐन (Rabi Season) रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने याची झळ अधिक तीव्र होती. आतापर्यंत कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप इथपर्यंतचेच परिणाम आपल्याला माहिती होते. मात्र, (Telangana) तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेली माहिती फार धक्कादायक आणि राज्यासाठी लाजिरवाणी आहे. महाराष्ट्रात सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट तेलंगणाच्या सीमेलगतच शेत जमिनी घेतल्या आहेत. येथेच बोअरवेल खोदून पुन्हा शेतीला पाणी पुरवठा करीत आहेत. सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावर बसलेले पक्ष हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अयशस्वी ठरले आहेत. यामुळे सीमालगतच्या शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनंतर का होईना तोडगा काढला जातो का हे पहावे लागणार आहे.

आठ तास विद्युत पुरवठा तो ही टप्प्याटप्प्याने..

रब्बी हंगाम हा पूर्णपणे साठवणूक केलेल्या पाण्यावर अवलंबून असतो. यंदा पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे टंचाई भासणार अशी स्थिती होती. मात्र, पिके बहरात असतानाच महावितरणकडून कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यंदाच नाही तर दरवर्षी शेतकऱ्यांची अशी अडवणूक केली जात आहे. यंदा तर कृषीपंपसाठी 8 तासच विद्युत पुरवठा तो ही दोन टप्यामध्ये. त्यामुळे उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांच्या परीश्रमात वाढ झाली होती. शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अशाप्रकारची नामुष्की ओढावत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी-विरोधक असमर्थ

निवडणुकांच्या तोंडावर आणि अर्थसंकल्पात केवळ शेतकऱ्यांप्रती सहानभूती दाखवली जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध घोषणा करण्यात आल्या असल्या तरी मूलभूत असणाऱ्या विजेचा प्रश्न सरकारकडून मार्गी लावला जात नाही. महाविकास आघाडीच नाही तर यापूर्वीच्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा प्रश्न निकाली काढलेला नव्हता.

बोअरवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवळ शेतीला नियमित वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी मिळावे या उद्देशाने तेलंगणात शेतजमिन घेतली आहे. आता याच शेती क्षेत्रात बोअरवेल घेऊन पिकांना पाणी दिले जात आहे. केवळ कृषी पंपाला सुरळीत विद्युत पुरवठा नसल्यामुळे काय वेळ येऊ शकते याचे उदाहरण म्हणजे तेलंगणा सीमेलगतचे हे शेतकरी.

संबंधित बातम्या :

Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार

Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत

Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली