AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत

राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी केली मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी जो मेसेज पाठवला जातो ती प्रक्रियाच बंद आहे. खरेदी केंद्राकडे बारदाणाच शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीची प्रक्रियाच गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.

Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत
हरभरा खरेदी केंद्रImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 25, 2022 | 2:31 PM
Share

जालना : राज्यात (Chickpea Crop) हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी (Shopping Center) खरेदी केंद्रावर नोंदणी केली मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी जो मेसेज पाठवला जातो ती प्रक्रियाच बंद आहे. खरेदी केंद्राकडे बारदाणाच शिल्लक नसल्याने हरभरा खरेदीची प्रक्रियाच गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. दरवर्षी (Farmer) शेतकऱ्यांचा माल सुरु झाली की ही समस्या समोर येतेच. मात्र, समस्यांपूर्वी उपाययोजना न करता आता किती दिवस खरेदी बंद राहणार या विवंचनेत शेतकरी आहे. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशीच काय ती अवस्था हमीभाव केंद्राची झाली आहे. सुरवातीला शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आता खरेदी केंद्रावरच समस्या निर्माण होत आहेत.

महिनाभरात केवळ 24 हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी

जालना जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. सुरवातीला नोंदणी आणि नंतर मालाचा दर्जा पाहून खरेदी ही प्रक्रिया आहे. येथील किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेतच हरभरा विक्रीला प्राधान्य दिले होते. मात्र, बाजारपेठेपेक्षा 600 रुपये अधिकचा दर असल्याने आता कुठे नोंदणीला प्रतिसाद मिळत होता. गेल्या महिन्याभरात 6 हजार 328 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे तर केवळ 24 हजार 181 क्विंटल हरभऱ्याची खरेदी ही केंद्रावर झाली आहे.

…म्हणून बारदाण्याची समस्या

राज्यात खरेदी केंद्र ही 1 मार्चपासून सुरु झाली आहेत. याच दरम्यान खरेदी केंद्रावर शेतीमाल साठवणूकीसाठी आवश्यक असलेला बारदाणा पोहचणे अपेक्षिक होते पण यासंबंधीचे टेंडर नाफेडने 21 मार्चला काढले आहे. त्यामुळे केवळ जालना जिल्ह्यातच नव्हे तर सबंध राज्यात ही समस्या उद्भवली आहे. शिवाय मराठवाड्यतील खरेदी केंद्रावर बारदाणा हा कोलकाता येथून पुरविला जातो. त्यामुळे आता कुठे निविदाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे अणखी काही दिवस तरी धिम्या गतीने हरभऱ्याची खरेदी होणार आहे.

अशी असते खरेदी केंद्रवरील प्रक्रिया

हमीभाव केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास प्रथम शेतकऱ्यांना त्या पिकाचा पीकपेरा घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागते. यासाठी आधारकार्ड, बॅंक पासबुक, सातबारा, 8 अ अशी कागदपत्रे अर्जाला जोडून सादर करावी लागतात. यानंतर संबंधित खरेदी केंद्रावरुन शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांनी माल केव्हा घेऊन यायचे यासंबंधी संदेश दिला जातो. त्यानंतर शेतीमालातील आर्द्रता तपासून खरेदी केली जाते तर खरेदी नंतर 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा नियम आहे. पण प्रत्यक्षात याला आवधी लागल असल्यानेच शेतकरी खुल्या बाजारपेठेकडे वळत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?

Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!

Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.