AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!

रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच खरिपाचे नियोजन केले जाते. यंदा तर खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतावर अवलंबून न त्याला सेंद्रीय तसेच इतर खतांची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम रासायनिक खत पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा वापर मोजकाच आणि आवश्यक तेवढा करणे गरजेचे आहे.

Agricultural Department : ठरलं त मग, खरिपात खताचा पुरवठा होणार पण कृषी विभागाच्या धोरणांचाही अवलंब करवाा लागणार..!
रासायनिक खत
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 25, 2022 | 1:17 PM
Share

पुणे : रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच (Kharif Season) खरिपाचे नियोजन केले जाते. यंदा तर खत पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने (Agricultural Department) कृषी विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतावर अवलंबून न त्याला सेंद्रीय तसेच इतर खतांची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (War) रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम रासायनिक खत पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताचा वापर मोजकाच आणि आवश्यक तेवढा करणे गरजेचे आहे. असे असतानाही कृषी विभागाने यंदा खरिपाचे नियोजन केले असून राज्यासाठी 45 लाख टन खताचे नियोजन केले आहे. यामध्ये युरिया, डीएपी, पोटॅश, सयुक्त खते आणि सिंगल सुपर फॉस्फेट यांचा समावेश आहे. केंद्राने आयोजित केलेल्या खत परिषदेतून उमटलेल्या सूरातून या खतसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि रासायनिक खतांचा वापरही कमी होईल अशा पध्दतीने कृषी विभागाने हे धोरण ठरवले आहे.

नेमका कसा ठरवला जातो खत साठा?

खताचे नियोजन करण्यापूर्वी केंद्र स्तरावर बैठकीचे आयोजन केले जाते. या खत परिषदेमध्ये सबंध कृषी विभागाकडून आढावा घेतला जातो. त्यामुळे जिल्हानिहाय आणि महिनानिहाय खत मंजूरीसाठी मागील तीन खरीप हंगामातील खताची विक्री ही विचारात घेतली जाते. जिल्हा निहाय खत साठा मंजूर करताना खरीप हंगाम 2019 ते 21 मधील खताचा वापर कसा होता ? याचा अभ्यास केला जातो. ज्या वर्षी अधिकचा वापर आहे आणि राज्याला मंजूर साठा किती आहे यानुसार जिल्हानिहाय खतसाठा मंजूल केला जातो.

सर्वच खताचा करावा लागणार वापर

एका शेतकऱ्यांने खताचा आग्रह केला की इतर शेतकरीही तेच खत मागणार आहे. सर्व गावातले शेतकरी केवळ एकाच खताची मागणी करतात त्यामुळे लागलीच टंचाई भासण्यास सुरवात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वच खतांचा घालून देलेल्या मर्यादेप्रमाणे वापर करणे हेच गरजेचे आहे. शिवाय अशा वापरामुळे कमी अधिकची तफावत राहणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीसाठी आणि खताच्या योग्य वापरासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषदेतील कृषी विभागाने जनजागृती करण्याच्या सूचना थेट कृषी आयुक्तांनीच दिल्या आहेत.

या खतांचा करावा लागणार उपयोग

केवळ एकाच खतावर भर न देता शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश याचे प्रमाण लक्षात घेऊन खताचा वापर करावा लागणार आहे. खरीप म्हणजे एप्रिल ते जानेवारी दरम्यानच्या काळात किती खत लागणार याची आकडेवारी कृषी विभागाने काढण्यात आली असून त्याच पध्दतीने पुरवठाही होणार आहे. महिनानिहाय कसा वापर होतो त्यावरुन साठा मर्यादा ठरवली जाते.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : हौसेला नाही मोल, डोहाळं जेवण गायीचे अन् कौतुक अख्ख्या गावाला

Rabi Season : सुगीवर चिंतेचे ढग, खरिपाप्रमाणेच रब्बीचीही अवस्था, काय आहे शेतशिवारातले चित्र?

Onion Market :आता उलटी गणती सुरु, महिन्यातच बदलले कांदा Market, उन्हाळी कांदा काढणीला पण करायचे काय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली