AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या राज्यात झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

झेंडूच्या फुलांची शेती करणं म्हणजे, दोन महिन्यात हे पीक तोडणीला येतं. झेंडूची शेती शेतकरी वर्षातून तीनवेळा करता येते. झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार २८ हजार रुपये मिळणार असल्याचं एका राज्याने जाहीर केलं आहे.

या राज्यात झेंडूच्या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार देतंय अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
marigoldImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2023 | 10:32 AM
Share

नवी दिल्ली : सध्या शेतीत अनेक बदल झाल्याचे आपण ऐकतोय आणि व्हिडीओच्या (farmer cultivation video) माध्यमातून पाहतोय. देशात अनेक शेतकरी पारंपारिक शेती करीत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या शेतीत फायदा आहे, अशा पद्धतीची शेती शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे कमी कालावधीत अधिक पैसे देणाऱ्या पिकाकडे लोकांचा अधिक कल असल्याचं पाहायला मिळतंय. झेंडूच्या फुलाची लागवड (Marigold Cultivation) ही अत्यंत कमी कालावधीत होते. दोन महिन्यात फुलांची तोडणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक कल त्याकडं आहे. बिहार सरकारने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ७० टक्के अनुदान (government subsidy) देण्याचा निर्णय घेतला आहे.

फुलांच्या लागवडीसाठी 70% अनुदान

बिहार हे राज्य शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक फलोत्पादन विकास मिशन योजना राबविते. त्यातून झेंडूच्या फुलांच्या लागवडीसाठी 70% अनुदान देत आहे. विशेष बिहार सरकार तिथल्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर किंमत 40 हजार देत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी http://horticulture.bihar.gov.in वर अर्ज करू शकतात.

४५ ते ६० दिवसांत झेंडूची फुल तोडणी

झेंडूच्या फुलांची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. खास गोष्ट म्हणजे ती ४५ ते ६० दिवसांत झेंडूची फुल तोडणीसाठी येतात. त्याचबरोबर झेंडूचं पीक बारा महिने घेतलं जातं. वर्षातून शेतकरी तीन पीकं घेत आहेत. देशातल्या चांगल्या सणात त्याची मागणी अधिक असल्यामुळे त्या पिकातून शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो.

कमी खर्चात अधिक फायदा

शेतकरी दिलेल्या माहितीनुसार समजा झेंडूच्या लागवडीला ४० हजार खर्च आला तर, त्यातून २ ते ४ लाख रुपयांचा फायदा मिळतो. त्यामुळं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पारंपरिक पिकांपेक्षा हा एक चांगला पर्याय आहे. अधिक शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झेंडूच्या फुलाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे रोपांना रोगराई होण्याची शक्यता अधिक कमी असते. अशा परिस्थितीत इतर पिकांच्या तुलनेत त्याची देखभाल करण्यात कोणतीही अडचण येत नाही. विशेष म्हणजे झेंडूच्या फुलांची लागवड केल्याने जमिनीत होणारे अनेक रोग देखील बरे होतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.