कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?

| Updated on: Oct 21, 2021 | 1:08 PM

महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ तर जे शेतकरी चालू बाकीत आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेला दोन वर्ष उलटली तरी आश्वासनांची पूर्तता ही झालेली नाही.

कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना बॅंकाकडून पैसे भरण्याचा तगादा ; काय आहे कारण?
Farmer
Follow us on

नांदेड : महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ तर जे शेतकरी चालू बाकीत आहेत त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या घोषणेला दोन वर्ष उलटली तरी आश्वासनांची पूर्तता ही झालेली नाही. शिवाय थकीत व्याजासाठी बॅंका ह्या शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. त्यामुळे शेतकरी हे अडचणीत आले आहेत. एकट्या नांदेड जिल्ह्यात 20 हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत. तर 15 हजार 98 खातेदार शेतकऱ्यांच्या याद्या ह्या निधिअभावी प्रसिध्दच झालेल्या नाहीत.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीची ही अवस्था दोन वर्ष उलटले तरी अशीच आहे.
जिल्ह्यातील 20 हजार 900 शेतकरी हे या लाभासाठी पात्र आहेत. पण त्यांची यादीच प्रसिध्द झालेली नाही. त्यामुळे सरकारची घोषणा हवेतच विरली असा सूर आता वाढत आहे. मोठा गाजावाजा करीत ही घोषणा करण्याात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर योजनेची अंमलबजावणी ही यशस्वीरित्या झालेली नाही.

आधार नोंदणीचीही अडचण

योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही बॅंकेत जमा करणे आवश्यक होते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील तब्बल 5 हजार 802 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. शासनाने निधीची पुर्तता करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यासाठी 1461 कोटी 36 लाख रुपये निधी अपेक्षीत होता. यापैकी दोन लाख 12 हजार 759 शेतकऱ्यांची कर्जखाती आधार लिंक केली आहेत. तर पोर्टलवर दोन लाख नऊ हजार 99 कर्जखाती अपलोड केली आहेत.

वर्षाखेरीस कर्जमाफी ही पुर्णात्वास येईल

कर्जमाफीतील 500 कोटींची तरतूद न झाल्याने राज्यातील 63 हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहेत. मात्र, हा मुद्दा डिसेंबर अखेरीस पर्यंत निकाली काढला जाणार असून या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पीककर्ज देण्याचे सहकार विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे दीड वर्षापूर्वी घोषणा करण्यात आलेल्या पीक कर्जमाफीला डिसेंबर महिन्यात पुर्णात्वास येईल अशी अपेक्षा आहे.

नियमित व्याज अदा करुनही शेतकऱ्यांची निराशाच

थकीत शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी तर नियमित व्याज अदा करुन चालूमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नसल्याने शेतकरी आता व्याज न अदा करता थकीत राहण्यातच समाधान मागत आहेत. प्रोत्साहनपर 50 हजार रुपये हे शासनाचे धोरण आहे. मात्र, अद्यापर्यंत याअनुशंगाने राज्य सरकारने निधी हा बॅंकेत जमा केला नसल्याने शेतकऱ्य़ांना नियमित व्याज हे भरावेच लागणार असल्याचे बॅंकाकडून सांगितले जात आहे. (Farmers did not get benefits even after completing two years of announcement of waiver scheme)

संबंधित बातम्या :

तयारी रब्बीची : ‘पेरलं की उगवंतच पण योग्य पेरंल की उत्पादनही वाढतं’

लाळ्या-खुरकूताने 35 जनावरे दगावली ; अशी घ्या जनावरांची काळजी

कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला