AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी ‘राजा’ डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला

फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परस्थितीमध्ये यंदा या आंब्याचे डिसेंबर महिन्यातच मुंबई बाजारपेठेत आगमन होत आहे.

वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी 'राजा' डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 20, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई : फळबागा अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने एक ना अनेक समस्या निर्माण केल्या होत्या. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार, आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, जगभरातील आंबा खवय्यांची निराशा फळांचा राजा असलेल्या देवगडच्या  (Mango Fruit Crop) हापूसने केलेले नाही. उलट प्रतिकूल परस्थितीमध्ये यंदा या आंब्याचे डिसेंबर महिन्यातच (Mumbai Agricultural Produce Market Committee) मुंबई बाजारपेठेत आगमन होत आहे. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हा आंबा दाखल झाला होता. मंगळवारी हापूस आंबा दाखल होणार असल्याने कोकणच्या राजाच्या आगमनाची जय्यत तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. आता मुहूर्ताच्या आंब्याला काय दर मिळतो याकडे उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यासह खवय्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

वाळकेवाडी गावच्या शेतकऱ्याला मिळाला मान

कुण्या शेतकऱ्याचा हापूस आंबा बाजारपेठेत सर्वाच आगोदर पोहचतो या देखील एक वेगळे महत्व असते. तीन महिन्यापूर्वीच देवगड तालुक्यातील वाळकेवाडी येथील शेतकरी अरविंद वाळके यांच्या आंब्याला मोहोर लागला होता. त्यानंतर योग्य जोपासना केल्यामुळेच आज हापूस आंब्याच्या 5 पेट्या मुंबई बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षात डिसेंबरमध्ये पहिल्या मोहोरचा आंबा मुंबई बाजारपेठेत आलेलाच नव्हता. मात्र, यावेळी प्रतिकूल परस्थितीमध्येही लवकर आंबा दाखल झाला आहे. मुंबई एपीएमसी येथील आंबा व्यापारी संजय पानसरे यांच्या गाळ्यावर पहिली पेटी येणार असून हापूसची विधीवत पूजा देखील पार पडली जाणार आहे.

ही सुरवात, मात्र फेब्रुवारीपासूनच खरा हंगाम

मंगळारी जरी हापूस आंब्याच्या 5 पेट्या दाखल होणार असल्या तरी हंगामाची खरी सुरवात ही फेब्रुवारीपासूनच होणार आहे. सध्या दाखल होत असलेला आंबा हा सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मोहोर लागलेला आंबा आहे. त्यानंतर मात्र, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मोहोरगळ झाली होती. यामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याचा परिणाम आंब्याच्या किंमतीवरही होणार असल्याचे बोलले जात आहे. ही सुरवात झाली असली तरी फेब्रुवारी-मार्च पासूनच खरा हंगाम सुरु होणार आहे.

बहरात असलेल्या आंबा पिकाला अवकाळीचा फटका

यंदा आंबा पिकासाठी सर्वकाही पोषक वातावरण होते. मोहोराने झाडे लगडली होती. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत होते. मात्र, अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा मोहोर गळाला व न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. लवकर सुरु होणारा हंगाम लांबणीवर पडलेला असल्याने उशिराच संपणारही आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तीन टप्प्यांमध्ये होते आवक

कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरु होते. आता जी आवक सुरु होणार आहे तरी पहिल्या टप्प्यातील आहे. वातावरणात बदलाचा फटका हा दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला बसलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मोहोराचे नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यातील मोहोर चांगलाच बहरलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी तिसऱ्या टप्प्यात नुकसान काही प्रमाणात नुकसान भरुन निघणार आहे.

संबंधित बातम्या :

शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी…

शर्यतीचा बैल विकत दिला नाही म्हणून चोरला, शोध घेत मालक दाही दिशा फिरला..!

आता तुरीच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर, विमा कंपन्यांची टाळाटाळ, प्रशासनाचा मात्र पाठपुरावा

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती