AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?

शेती आणि संबंधित व्यवसायांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे. लुधियाना येथील संस्थेनं एक प्रणाली यंत्रणा तयार केली आहे. त्या प्रणालीमध्ये जिवंत माशांची वाहतूक करता येते.

खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?
मासेमारी
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Aug 23, 2021 | 8:04 AM
Share

नवी दिल्ली: शेती आणि संबंधित व्यवसायांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे  शोध लावले जात आहे. लुधियाना येथील संस्थेनं एक यंत्रणा तयार केली आहे. त्या यंत्रणेत जिवंत माशांची वाहतूक करता येते. यामध्ये ग्राहकांना थेट जिंवत मासे पोहोचवले जातात.

भारतात बऱ्याच ठिकाणी मासे खाल्ले जातात. मासे खाणारा एक वर्ग आपल्या देशात आहे. अनेक कारणांमुळे मत्स्य उत्पादक शेतकरी त्यांच्या ग्राहकांना जिवंत मासे देऊ शकत नाहीत. बाजाारत विक्रीसाठी नेताना वाटेत मासे मरतात. परिणामी मच्छिमारांना मासळीची संपूर्ण किंमत बाजारात मिळू शकत नाही. डीडी किसानच्या अहवालानुसार, आता सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लुधियाना यांनी या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.

लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम

लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम अर्थात LFCS द्वारे ग्राहकांपर्यंत थेट मासे देण्यात येतात. ही यंत्रणा ई-रिक्षावर बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा डीसी पॉवरवर चालते, यामध्ये चार बॅटरी बसवण्यात आल्या आहेत.एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलो वजन 80 किमी पर्यंत नेण्यास सक्षम आहे. वाहतुकीदरम्यान मासे जिवंत ठेवण्यासाठी वेंटिलेशन, फिल्टरेशन आणि अमोनिया काढण्यासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अर्धा ते दीड किलो वजनाचा कॉर्प घेतला गेला तर 40 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मृत्यूचे प्रमाण 1 टक्क्यापेक्षा कमी आहे.

एकावेळी 100 किलो माशांची वाहतूक

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या वाहनातून गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील माशांची वाहतूक करता येते. हे वाहन एका वेळी 100 किलो जिवंत मासे वाहून नेऊ शकते. आवश्यक असल्यास त्याची वाहून नेण्याची क्षमता वाढवता येऊ शकते. किरकोळ बाजारात जिवंत मासे वाहून नेण्याव्यतिरिक्त, त्याचा वापर मत्स्यपालनासाठी तलावांमध्ये मत्स्य बियाणे नेण्यासाठी केला जात आहे.

एक व्यक्ती चालूव शकतो

अनेक मत्स्य उत्पादक शेतकरी या मोबाईल व्हेईकलचा वापर करत आहेत. संपूर्ण यंत्रणा असलेल्या या वाहनाची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे. पाणी वाचवण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा 50 टक्के पाण्याची बचत यामध्ये होते.

हे वापरण्यास खूप सोपे असून एक कामगार हे सर्व नियंत्रित करु शकतो. हे वाहन कमी खर्चिक आणि पर्यावरणास अनुकूल आहे. ग्राहकांना ताजे आणि दर्जेदार मासे यामुळं उपलब्ध होतात.

इतर बातम्या:

फ्लावर-कोबी करताय, मग सावधान, ‘या’ कंपनीचं बियाणं बोगस असल्याचा गंभीर आरोप

धक्कादायक, कांद्यावर यूरिया फेकत 450 पिशव्यांचं नुकसान; शेतकऱ्याचं साडे तीन लाखांचं नुकसान

Live fish supply to customer by LFCS special system fishermen also get benefit

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली