Mango : आंबा फळपिक अंतिम टप्प्यात, योग्य जोपासणा केल्यासच फळ पडणार पदरात

| Updated on: Apr 29, 2022 | 4:22 PM

आंब्याच्या झाडावरुन तो किती फळांची जोपासणा करु शकतो हे समजते. परिपक्व आंब्याचे झाडच कोयीचे रुपांतर आंब्यापर्यंत होईपर्यंत जोपासणा करु शकतात. पण कधी कधी झाड खूप जुनं झाल्यावर किती फळ परिपक्व होणार हे सुध्दा सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत आंब्याच्या कैऱ्या पडतच राहतात. ज्यापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Mango : आंबा फळपिक अंतिम टप्प्यात, योग्य जोपासणा केल्यासच फळ पडणार पदरात
हंगामाच्या अंतिम टप्प्यात आंबा गळतीचा धोका असतो. या काळात योग्य जोपासणा केल्यासच उत्पादनात वाढ होणार आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : आंबा फळपिकासाठी सध्याचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. आब्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात कैऱ्या लागलेल्या असतात. या अवस्थेतच (Of fruit leakage) फळगळतीचे प्रमाण हे अधिक असते. त्यामुळे या दरम्यानच्या काळात प्रभावी उपाययोजना राबविल्यासच (Increase Production) उत्पादनात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांच्या दुर्लक्षामुळे 95 टक्के फळगळती होते तर 5 टक्के कैऱ्या ह्या आंब्याला राहतात. सध्याचा काळ (Mango Fruit) आंबा फळबागांसाठी महत्वाचा आहे. प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्यास आंबा पिकावर किडे पडण्याची शक्यता असते. आंबा फळपिकाची जोपासणा करण्याच्या अनुशंगाने फलोत्पादन तज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद, सेंट्रल युनिव्हर्सिटीचे फळ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंग यांनी आंबा उत्पादकांना महत्वपूर्न सल्ला दिला आहे. याची माहिती प्रत्येक आंबा उत्पादकांना असणे गरजेचे आहे.

आंबा फळबागांची नेमकी काय काळजी घ्यावी

डॉ. राजेंद्र प्रसाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचे फळ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंह यांच्या मते, आंबा बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी सर्व झाडांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आंब्याच्या झाडावरुन तो किती फळांची जोपासणा करु शकतो हे समजते. परिपक्व आंब्याचे झाडच कोयीचे रुपांतर आंब्यापर्यंत होईपर्यंत जोपासणा करु शकतात. पण कधी कधी झाड खूप जुनं झाल्यावर किती फळ परिपक्व होणार हे सुध्दा सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत आंब्याच्या कैऱ्या पडतच राहतात. ज्यापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

आंब्याचे सिंचन गरजेचे

संगोपन करुनही आंब्याच्या झाडावरून अजूनही कैऱ्या गळती होत असल्यास या टप्प्यावर हलके सिंचन सुरू करावे. जेणेकरून बागेच्या जमिनीत ओलावा राहील, पण यामुळे झाडाच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.आंब्याचे झाड 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जुने असल्यास 500-550 ग्रॅम डायमोनियम फॉस्फेट, 850 ग्रॅम युरिया व 750 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश व 25 किलोच्या मिश्रणाने फवारणी करावी लागणार आहे.

आंबा तोडण्यापूर्वी ही प्रक्रिया गरजेची

आंब्याची कोय तयार होताना कीटकनाशकांची फवारणी केली तर त्याची वाढ अधित जोमात होणार आहे. त्यामुळे क्लोरिपायफॉस 2.5 मिली पाण्याची फवारणी केल्यास आंब्यावरील कीटकांचे समूळ नष्ट होतात. गतवर्षी फळमाशीमुळे मोठे नुकसान झाले. बिहारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आंब्याचे नुकसान झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे वातावरणात प्रचंड ओलावा असल्याने यंदाही फळमाशीतून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फळांच्या माशीच्या किमान 2 महिने आधी बागेत 15 हेक्टर या दराने फेरोमन सापळा लावणे आवश्यक आहे. कीटकनाशकांवर फळमाशींचे प्रभावी नियंत्रण नसते.

असे आहे आंब्याचे उत्पादन

देशात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आंबा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. 2018-19 च्या जनगणनेनुसार भारतात 2 हजार 296 हजार हेक्टर आंब्याची लागवड केली जाते. यातून 21 हजार 378 हजार टन उत्पादन होते. आंब्याची राष्ट्रीय उत्पादकता हेक्टरी 8.7 टन आहे. बिहारमध्ये 150.68 हजार हेक्टर क्षेत्रात याची लागवड केली जाते. त्यामधून 1 हजार 479 हजार टन उत्पादन होते. बिहारमध्ये आंब्याची उत्पादकता प्रतिटन 9.8 टन असून, ती राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा किंचित जास्त आहे.