AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad : पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवल्याचा आरोप, चेक बाऊन्स झाल्यानंतर…

अनेकदा शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना फसवणूक केली जाते. विशेष वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाची फसवणूक केली असल्याचं उजेडात आलं आहे. परंतु पोलिस अधिकाऱ्याने गोड बोलून फसवल्याने त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

Osmanabad : पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडवल्याचा आरोप, चेक बाऊन्स झाल्यानंतर...
farmer usmanabadImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 06, 2023 | 11:45 AM
Share

उस्मानाबाद : जिल्ह्यात एका पोलिस अधिकाऱ्याने (Police officer) शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी (Farmer) संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उस्मानाबाद पोलिस अधिक्षकांकडे (Osmanabad Superintendent of Police) तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकाऱ्याने चेक देऊन माल खरेदी केला होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे तक्रार दाखल्यानंतर पोलिस अधिक्षक काय भूमिका घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर ज्यावेळी शेतकऱ्यांनी पैशाची मागणी केली, त्यावेळी शेतकऱ्यांना धमकावण्यात सुद्धा आलं आहे.

तुमच्या शेतीमालाला चांगला अधिकचा भाव देतो

इतर खरेदी केंद्रापेक्षा तुमच्या शेतीमालाला चांगला अधिकचा भाव देतो असं सांगत एका पोलीस अधिकाऱ्याने उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या प्रकरणी रुईभर, बरमगाव, गावसुद यासह इतर गावातील शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

33 शेतकऱ्यांची फसवणूक

मागील दीड वर्षापूर्वी नानासाहेब भोसले या पोलीस अधिकाऱ्याने रूईभर येथील 33 शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल खरेदी करून तब्बल पन्नास लाख रुपये बुडवल्याचा आरोप केला आहे. शेतमाल खरेदी करण्यापूर्वी कारनामा करून शेतमाल विक्री करण्यात आला होता. तसेच चेकही देण्यात आले होते, मात्र हे चेक बाऊन्स झाल्याने शेतकऱ्यांनी पैश्यांची मागणी केली, असता त्यांनाच धमकवण्यात आल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

अनेकदा शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना फसवणूक केली जाते. विशेष वजन काट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाची फसवणूक केली असल्याचं उजेडात आलं आहे. परंतु पोलिस अधिकाऱ्याने गोड बोलून फसवल्याने त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.