Kharif Season : भलरीची गाणे अन् शेतकऱ्यांचा उत्साह, भात शेतीने फुलतोय भोर तालुक्याचा शिवार..!

| Updated on: Jul 11, 2022 | 10:05 AM

पूर्वमोसमी पाऊस बरसल्या नंतर बराच काळ पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवेल का कायं? अशी भीती होती. मात्र जुलैच्या सुरुवाती पासूनचं वरुनराजाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आता भात शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे.

Kharif Season : भलरीची गाणे अन् शेतकऱ्यांचा उत्साह, भात शेतीने फुलतोय भोर तालुक्याचा शिवार..!
राज्यात भात लागवडीला वेग आला आहे.
Follow us on

पुणे : (Heavy Rain) पावसाने शेती व्यवसयाचे चित्र कसे बदलते याचे प्रत्यय सध्या राज्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांनी शिवार हिरवागार झाला आहे तर पुण्यातील भोर तालुक्यात भलरीची गाणे गात बळीराजा (Paddy cultivation) भात लागवड करीत आहे. ही सर्व निसर्गाची कृपा असून गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. एकमेकांना स्फूर्ती मिळावी यासाठी समूहाने गाणी म्हणून थकवा दूर केला जातो. सध्या या भलरी गीतांचे स्वर ग्रामीण भागातील शेतात ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे (Agricultural activities) शेती कामे तर वेगात होतच आहेत पण अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. शिवाय चारसूत्री कार्यक्रम राबवून ही लागवड केली जात असल्याने उत्पादनातही वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

दुबार पेरणीच संकट टळलं अन् चित्रच बदललं

पूर्वमोसमी पाऊस बरसल्या नंतर बराच काळ पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवेल का कायं? अशी भीती होती. मात्र जुलैच्या सुरुवाती पासूनचं वरुनराजाची दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आता भात शेतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. भोर तालुक्यात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढा,वाहळ,परिसरातील भात खाचरे पाण्याने वाहू लागलीयेत. त्यामुळं या परिसरात भात लावणीला कामांना वेग आला आहे. भात पीक हेच खरिपातील मुख्य पीक आहे तर यावरच शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

पारंपरिक भलरीच्या गाण्यावर भात लागवड

भात लावणी करताना पारंपरिक भलरीची गाणी भात खाचरात धुमधूमू लागली आहेत. गाणी गुणगुणत भात लावणी सुरू असल्याचं चित्र सध्या जागोजागी पाहायला मिळतंय.भात लावणी करताना वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि चिखलात ही लावणी करावी लागते. त्यामुळे शारीरिक थकवा येतो, अशी कष्टाची कामे करताना थकवा जाणवू नये, श्रमपरिहार व्हावा, लावणी करताना उत्साह वाढावा म्हणून भलरीची गाणी गायली जात असतात. शिवाय यामुळे वेळ कसा जातो हे कळतं नाही , लावणी लवकर होते. पुर्वी जंगलाचे प्रमाण जास्त होते,जनावर, प्राणी शेतात किंवा परिसरात असेल तर या आवाजाने जनावरे पळून जातात.

हे सुद्धा वाचा

चारसूत्री कार्यक्रम राबवून रोवणी

भाताची लागवड करताना दोन्ही रोपांमधील अंतर 15*25 सेंटीमाटर ते 15*25 असे ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सरीमध्ये आलटूनपालटून असेच अंतर ठेवणे गरजेचे आहे. भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर 15 सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. अंदाजाने 15 सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे.