नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये 9 ऑगस्टला वर्ग केले होते. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचे नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत 12 कोटी शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. मात्र, सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. तर, 2 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणे स्थगित करण्यात आलं आहे.
पीएम किसान योजना योजनेसाठी काही अपात्र शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अपात्र शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. केंद्र सरकारनं आता पीएम किसान योजनेचा अपात्र असतानाही लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत, अशा तब्बल दोन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवणे थांबवण्यात आले आहेत. जे शेतकरी प्राप्तिकर भरतात त्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यात येत आहेत.
पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता आज जारी होत आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार
PM Kisan scheme displayed installment of more than 2 crore farmers stopped know reason