AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी

पीक पध्दतीमध्ये बदल हा केवळ रब्बी हंगामापूरताच मर्यादित राहिलेलान नाही तर लेट उन्हाळी हंगामातही तो सुरुच आहे. खरिपात सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामातून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक प्रयोग केले आहेत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तब्बल 18 हजार हेक्टरावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Summer Soybean : शेतकऱ्यांची मोहीम फत्ते, लेट पण थेट सोयाबीनचा विक्रमी पेरा, बियाणाचा प्रश्न मार्गी
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 18, 2022 | 10:07 AM
Share

औरंगाबाद: पीक पध्दतीमध्ये बदल हा केवळ रब्बी हंगामापूरताच मर्यादित राहिलेलान नाही तर लेट (Summer Season) उन्हाळी हंगामातही तो सुरुच आहे. खरिपात सोयाबीनचे पावसामुळे नुकसान झाले असले तरी रब्बी आणि उन्हाळी हंगामातून झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Crop Change) एक ना अनेक प्रयोग केले आहेत. (Marathwada) औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तब्बल 18 हजार हेक्टरावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यामुळे खरिपातील बियाणांची तर चिंता मिटलेली आहेच पण उतारा जर अधिकचा पडला तर यामधून चार पैसेही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहेत. खरीप हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले पण पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचे धाडस याच नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी केले आहे. उन्हाळी सोयाबीनला उतारा कमी असतो असे सांगितले जाते पण पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे शिवाराचे चित्रच बदलले आहे.

सध्या फुल अवस्थेत सोयाबीन

केवळ रब्बी हंगामाताच नाही तर उन्हाळ्यातही उशिरा का होईना सोयाबीनचा पेरा हा झालेलाच आहे. पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनला फुले आणि शेंगा लागलेल्या आहेत. त्यामुळे उत्पादनाची हमी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरवर्षी केवळ ज्वारी, हरभरा आणि गव्हावरच शेतकऱ्यांचा भर असतो. यंदा मात्र, मोहरी, सुर्यफूल, भुईमूग, राजमा अशा वेगवेगळ्या पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. मध्यंतरीची अवकळी आणि ढगाळ वातावरण वगळता इतर कशाचाही धोका नसल्याने पीके बहरात आहेत.

असा आहे औरंगाबाद विभागतला सोयाबीन पेरा

औरंगाबाद विभागात यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल झालेला आहे. दरवर्षी सोयाबीनचे पीक घेतले जाते पण केवळ खरिपातील बियाणांची उपलब्धता व्हावी म्हणून. पण यंदा उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी हा बदल घडवून आणला आहे. जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 8 हजार 206 हेक्टरावर, बीड जिल्ह्यामध्ये 7 हजार 950 हेक्टरावर पेरा झाला आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास 3 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे. त्यामुळे बियाणांचा तर प्रश्न मिटणारच आहे पण शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनही पडणार आहे.

सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव

बहरात असलेल्या सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे पिकाच्या शेंड्याकडील भाग हा वाळत आहे. जर याच किडीने बुडापर्यंत शिरकाव केला तर मात्र, उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे वेळीच थायामिथोक्झाम (30 एफ. एस.) 0.25 मि.लि. (50 मि.लि. प्रति एकर) किंवा इथिऑन 3 मि.लि. (600 मि.लि. प्रति एकर याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, आता योग्य नियोजन हाच पर्याय!

Intercropping : उत्पादन वाढीसाठी कायपण? ऊसतोडणी होताच शेतकऱ्यांची भन्नाट Idea..!

PM Kisan Yojna : दोन कागदपत्रावरच होणार ‘ई-केवायसी’, 11 व्या हप्त्याची तारीखही ठरली!

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.