AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondiya : धान खरेदीला ‘हमीभाव केंद्रा’चा आधार, व्यापाऱ्यांची मनमानी, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

धान पिकाला हमीभाव ठरवून त्यानुसार विक्री झाली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. काढणी कामे अटोपूनही केवळ योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांची अडचण आणि केंद्र सरकारच्या उदासिनतेचा फायदा मात्र व्यपाऱ्यांना होत आहे.

Gondiya : धान खरेदीला 'हमीभाव केंद्रा'चा आधार, व्यापाऱ्यांची मनमानी, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
धान शेती
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 19, 2022 | 11:54 AM
Share

गोंदिया : कधी उत्पादनात घट कधी (Agricultural goods) शेतीमालाला कवडीमोल दर…यापैकी एकतरी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजलेले आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये सरकारने (Farmer) शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे. सध्या (Rabi Season) रब्बी हंगामात धान पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हेच मुख्य पीक आहे. त्यामुळे उत्पादन घटले असले तरी धान शेतीला हमीभावाचा आधार मिळाला तरच शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. अन्यथा व्यापाऱ्यांचे अर्थार्जन कायम सुरुच राहणार आहे. मळणी केलेले धान्य दराअभावी कवडीमोल दरात विक्री करावे लाग आहे. शासनाने आता शेतकऱ्यांचा अंत ना पाहता त्वरित जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे.

शेतकऱ्यांची नामुष्की, धान्याची कमी किंमतीमध्ये विक्री

धान शेतीची काढणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असताना योग्य दर मिळाला असता तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. पिकाची काढणी सुरु असतानच धान खरेदी केंद्र ही सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, ही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडेच शेतीमालाची विक्र करावी लागत आहेत. बाजारपेठ आणि हमीभाव केंद्रातील दरात मोठी तफावत आहे. शिवाय शेतकऱ्यांना आता खरिपाचे वेध लागले आहेत. त्यापूर्वीच धान्य खरेदी करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान व्यापाऱ्यांची खेळी

धान पिकाला हमीभाव ठरवून त्यानुसार विक्री झाली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. काढणी कामे अटोपूनही केवळ योग्य दर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांची अडचण आणि केंद्र सरकारच्या उदासिनतेचा फायदा मात्र व्यपाऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाची साठवणूक आणि दर वाढले की विक्री हे व्यापाऱ्यांचे गणित ठरलेले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे अधिकच्या उत्पादनाचे गणित पुरते बिघडले आहे.

साठवणूक पेक्षा विक्रीला पसंती

सध्या खरिपाची लगबग सुरु आहे. शेतकऱ्यांना शेती मशागत, तसेच बी-बियाणे यासाठी पैशाची आवश्यकता आहे. असे असताना शेतीमालाची साठवणूक कऱणे हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे खरेदी केंद्राची वाट न पाहता शेतकरी थेट व्यापाऱ्यांनाच शेतीमालाची विक्री करीत आहेत. व्यापारी हाच माल साठवणूक करुन योग्य दर मिळताच विक्री करतात. शेतीमाल शेतकऱ्यांचा अन् फायदा व्यापऱ्यांचा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे केंद्राने त्वरीत धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा