आगामी काळात शिवसेनेचा दसरा मेळावा हा बीकेसी मैदानावरच होणार. शिवाय मेळाव्याला गर्दी नाही तर जमलेले शिवसैनिक कोणत्या विचाराचे सोने लूटतात हेच महत्वाचे असल्याचे शहाजीबापू म्हणाले आहेत.
बंडखोर आमदार हे सत्तेत असले तरी ते कायम सत्तेतच राहतील असे नाही. गद्दारांना लोक स्विकारत नाहीत, हा इतिहास आहे. अशी एक ना अनेक उदाहरणे देत अजित पवारांनी प्रथमच भर सभेत ठाकरेंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G च्या सेवेला सुरवात तर झाली आहे. अद्याप सर्वत्र एकाच वेळी ही सेवा पुरवली जाणार नसली तरी त्याचा नेमक लाभ कसा घ्यायचा हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे आहे.
कृषीपंप आणि गावठाण याचे विद्युत फिडर हे वेगळे झाले आहेत. त्या ठिकाणी विद्युत पुरवठा हा सोलरवर करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा 12 तास लाईट उपलब्ध राहील असा अंदाज आहे.
ज्या राष्ट्रवादीमुळे बंडाची भूमिका घेतली असे सांगणारे शिंदे गटाचे आमदार पवारांपुढे उघडपणे काही बोललेलच नाहीत. दीपक केसरकर यांनी तर पहिल्यापासून सावध पवित्राच घेतला होता. आज तर शरद पवार आणि ते एकाच व्यासपीठावर होते.
दोन दिवसांपूर्वी मंत्री संदीपान भुमरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. शंकरराव गडाख यांना मंत्रीपदे देण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल त्यांनी थेट पक्षप्रमुखांना दिला होता.
अशोक गहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री तर आहेतच पण तेथील सरकारमध्ये त्यांच्या आमदारांचा एक गट आहे. शिवाय त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली तर येथील मुख्यमंत्रीपद कुणाकडे हा खरा कळीचा मुद्दा होता.
मध्यंतरी थापा जे बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सावलीप्रमाणे असायचे त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुनही राजकारण सुरु झाले होते.
सत्तांतरानंतर देखील केवळ राजकीय स्वार्थ साधण्यावर राज्य सरकारमधील पक्षाचे लक्ष आहे. विकास कामे तर दूरच केवळ घोषणाबाजीत सरकार व्यस्त असून लवकरच सर्वकाही जनतेच्या समोर येईल असे निलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती. पण आता स्थिती बदलली आहे. उजनी आणि सीना कोळेगाव येथून पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले.