AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : शेतकऱ्यांना सल्ला अन् विरोधकांना टोला, उस्मानाबादेत पवारांचा दुहेरी उद्देश साध्य..!

दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती. पण आता स्थिती बदलली आहे. उजनी आणि सीना कोळेगाव येथून पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar : शेतकऱ्यांना सल्ला अन् विरोधकांना टोला, उस्मानाबादेत पवारांचा दुहेरी उद्देश साध्य..!
अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Oct 01, 2022 | 2:53 PM
Share

संतोष जाधव, Tv9 मराठी, उस्मानाबाद : राजकारणात (Politics) कोणीच कोणाचा कायमचा विरोधी नसतो आणि मित्रही नसतो. जनतेच्या मनात असेल तेच होते. पण सध्या जनतेचा विचार न करता स्वार्थ साधला जात आहे. शिवाय स्वार्थ साधूनही सध्याच्या मंत्री-आमदारांची भाषा ही सर्वसामान्यांना भावणारी नाही. हे सर्व होत असले तरी लोक डोक्यावरही घेतात आणि वेळप्रसंगी पायाखालीही असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. लोकप्रतिनिधींना (Public representative) त्यांच्या जबाबदारीचे भान राहिलेले नाही. त्यामुळेच अशी हाणामारीची आणि खाज सुटल्याची भाषा त्यांच्या तोंडात असल्याचे म्हणत पवारांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.

राजकारण हे निवडणुकांपुरते ठीक आहे. मात्र, विकास कामात राजकारण येऊ नये. काळाच्या ओघात मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिकचे उत्पादन देणाऱ्या 82032 किंवा 12121 अशा वाणाची लागवड करावी. 265 या वाणाच्या शेतकऱ्यांनी नादीच लागू नये असा सल्लाही त्यांनी दिला.

दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती. पण आता स्थिती बदलली आहे. उजनी आणि सीना कोळेगाव येथून पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

तेरणा कारखाना मिळावा म्हणून अमित देशमुख आणि तानाजी सावंत यांनी टेंडर भरले आहे. मात्र, हा वाद कोर्टात असून कोर्टाच्या निकालाशिवाय तेरणा कुणाकडे जाणार हे स्पष्ट होणार नसल्याचेही पवारांनी सांगितले आहे. राजकारण काही असो शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणे हे महत्वाचे आहे.

मराठवाड्यामध्ये कारखान्यांचे जाळे वाढत आहे. मात्र, या कारखान्यातून गुळ काढताय की इथेनॉल याचे शेतकऱ्यांना काही देणे-घेणे नाही मात्र, चांगला दर अपेक्षित आहे. ऊसाला भाव, वेळेवर पैसे आणि काट्यात घाटा नसावा ह्याच शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत.

शिंदे सरकारमधील आमदार हे चुन चुनके, गिन गिनके मारुंगा अशी भाषा करीत आहेत. येथे काय मोगलाई आहे काय? जनता हुशार आहे, आज डोक्यावर घेतले तर उद्या पायाखालीही घेता येते, हे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे म्हणत त्यांनी आ. संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांना सूचक इशाराच दिला आहे.

Follow Us
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.