AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 % टक्के भारतीयांना आहे नोकरी जाण्याची भीती ?

मनी 9 च्या पर्सनल सर्व्हेनुसार 24 % लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून 56 % लोकांमध्ये हे भीतीचे प्रमाण कमी आहे.

24 % टक्के भारतीयांना आहे नोकरी जाण्याची भीती ?
| Updated on: Dec 28, 2023 | 1:33 PM
Share

कोरोनानंतर भारताच्या अर्थ व्यवस्थेवर खोलवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. देशात बेरोजगारीच्या संख्येत देखील वाढ होत असून आता अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे. मनी 9 च्या पर्सनल सर्व्हेनुसार 24 % लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून 56 % लोकांमध्ये हे भीतीचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच एकूण 80 % लोक हे नोकरी जाण्याच्या भीतीमध्ये वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वेक्षणानुसार ज्या 24 % लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यांच्याकडे पुरेशी म्हणजे 6 महीने पुरेल इतकी बचत आहे. तसेच ज्या 56 % लोकांना नोकरी गेल्यास त्यांच्याकडे 2 ते 3 महीने काढता येतील इतकी बचत असल्याचे समोर आले आहे.

किती कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ? :

भारतातील बहुतांश कुटुंबं ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आकडेवारीनुसार केवळ 6 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असून 20 % कमी सुरक्षित आहेत तर 36 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आणि 38 % कुटुंबं संकटात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच 7 % भारतीय कुटुंबांच्या मासिक उत्पन्नातून खर्च भागवणेदेखील कठीण जात आहे.

बिहार, ओडिसा, झारखंड, आसाम , प. बंगाल या राज्यातील लोकांचे उत्पन्न सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्वेक्षणानुसार भारतातील 39 % कुटुंबांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी असल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.