G20 च्या आधी जागतिक बँकेकडून भारताचे कौतुक, 50 वर्षाचे काम फक्त 6 महिन्यात

जागतिक बँकेने G20 बैठकीपूर्वी एका दस्तऐवजाद्वारे भारताचे भरभरून कौतुक केले आहे. जागतिक बँकेने भारताच्या UPI, जन धन, आधार, ONDC आणि Cowin सारख्या गोष्टींची प्रशंसा केली आहे.

G20 च्या आधी जागतिक बँकेकडून भारताचे कौतुक, 50 वर्षाचे काम फक्त 6 महिन्यात
shailesh musale | Updated on: Sep 08, 2023 | 7:41 PM

मुंबई : G20 च्या आधी जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. G20 च्या आधी तयार केलेल्या दस्तऐवजात, जागतिक बँकेने म्हटले आहे की भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI चा प्रभाव आर्थिक समावेशापेक्षा जास्त आहे. दस्तऐवजात भारताचे कौतुक करताना जागतिक बँकेने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने ते केलंय जे गेल्या पाच दशकांत जे साध्य केले नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने 50 वर्षांचे काम 6 वर्षात केले आहे. जे जगभरातील जीवन बदलू शकते. यामध्ये UPI, जन धन, आधार, ONDC आणि Cowin सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत

G20 शिखर परिषदेपूर्वी तयार करण्यात आलेल्या जागतिक बँकेच्या दस्तऐवजात, जागतिक बँकेने म्हटलेकीस मोदी सरकारने सुरू केलेल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना आकार देण्याचे काम केले आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की JAM (जन धन, आधार, मोबाइल) त्रिमूर्ती – सर्वांसाठी बँक खाती, आधार आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीचा अनेकांना फायदा झाला आहे. आर्थिक समावेशन दर 2008 मधील 25% वरून गेल्या सहा वर्षात 80% पेक्षा जास्त झाला आहे, जो DPI मुळे 47 वर्षांपर्यंत खाली आला आहे.

जनधनचा फायदा महिलांना झाला

नरेंद्र मोदी यांनी 20214 मध्ये जन धन योजना सुरू केली होती. त्यानंतर जून 2022 पर्यंत पंतप्रधान जन धन योजना खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 46.2 कोटी झाली आहे. यापैकी 56% खाती महिलांची आहेत, जी 26 कोटींहून अधिक आहे.

बँका जोडण्याचे काम

PMJDY ने बँकिंग प्रणालीमध्ये बँकिंग नसलेल्यांना आणले आहे. याशिवाय UPI ने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. देशाला पुढे नेण्यात यूपीआयचेही महत्त्वाचे योगदान आहे. भारतात रिटेल डिजिटल पेमेंटसाठी UPI पेमेंट पद्धत खूप लोकप्रिय झाली आहे आणि तिचा वापर झपाट्याने वाढत आहे.

इतर देशांनाही फायदा

UPI चे फायदे केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून इतर देशांनाही त्याचा लाभ मिळू शकतो, यावर भारत सरकारचा भर आहे. आतापर्यंत, श्रीलंका, फ्रान्स, UAE आणि सिंगापूर यांनी उदयोन्मुख फिनटेक आणि पेमेंट सोल्यूशन्सवर भारतासोबत हातमिळवणी केली आहे.

Follow Us