निवडणुकीच्या काळात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम बाळगताय? ही बातमी वाचाच

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या, त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पथकांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून 31 मार्चपर्यंत 300 कोटींची रोकड जप्त केली आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान 50 हजार जास्त रक्कम स्वत: जवळ बाळगल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई […]

निवडणुकीच्या काळात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम बाळगताय? ही बातमी वाचाच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुका जाहीर झाल्या, त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पथकांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून 31 मार्चपर्यंत 300 कोटींची रोकड जप्त केली आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर होत असल्याच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीदरम्यान 50 हजार जास्त रक्कम स्वत: जवळ बाळगल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते.  पण या कारणामुळे व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत व्यापारी वर्गाने निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती. यावर नुकतंच निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, कोणतीही व्यक्ती 50 हजार किंवा त्याहून कमी रक्कम स्वत: जवळ बाळगू शकते. मात्र 50  हजारपेक्षा जास्त रक्कम असल्यास तुमच्यासोबत ही तीन कागदपत्र पुरावा म्हणून असणे गरजेचं आहे.

तीन कागदपत्र कोणती?

  • ओळखपत्र – 50 हजारपेक्षा जास्त रक्कम बाळगणाऱ्या व्यक्तीला स्वत:चे आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्राईव्हींग लायसन्स यांसारखे ओळखपत्र बाळगणे गरजेचे असणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीकडे पैशाच्या देवाण-घेवाणचे पुरावा असणे अनिर्वाय असणार आहे.
  • पैसे काढल्याचा पुरावा- जर तुम्ही काही कारणात्सव बँकेतून 50 हजारपेक्षा जास्त रक्कम काढलात,तर तुमच्याकडे त्या बँकेतून पैसे काढल्याचा पुरावा असणे गरजेचे आहे.
  • पैशांचा वापर कशासाठी- जर तुम्ही पैसे एखाद्या शस्त्रक्रिया किंवा खासगी कारणास्तव काढले असतील, तर त्याबाबत तुमच्याकडे पुरावा असणे गरजेचं आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 50 हजारपेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या सर्वसामान्य लोकांपासून व्यापारी वर्गापर्यंत सर्वांकडे हे तिन्ही कागदपत्र असणे गरजेचं आहे. कारण याद्वारे निवडणूक आयोगाला त्याचा वापर नेमका कुठे होणार आहे, याची कायदेशीर माहिती मिळू शकेल. त्यासाठी बँकेची पैसे काढल्याची पावती आणि व्यापाराची पावती असणे गरजेचं असणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने दागिन्यांवर मात्र कोणतीही कारवाई होणार नाही असे स्पष्ट केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.