AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुहिन कांता पांडे होणार SEBI चे नवे प्रमुख, पांडे यांचे शिक्षण काय? त्यांना किती वेतन मिळणार? जाणून घ्या

सरकारने SEBI च्या नव्या प्रमुखाच्या नावाची घोषणा केली आहे. विद्यमान अर्थ सचिव तुहिन कांता पांडे यांची SEBI चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माधवी बुच यांच्या जागी ते जबाबदारी सांभाळतील. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि त्यांना किती पगार मिळणार आहे? याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

तुहिन कांता पांडे होणार SEBI चे नवे प्रमुख, पांडे यांचे शिक्षण काय? त्यांना किती वेतन मिळणार? जाणून घ्या
तुहिन कांता पांडेImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 3:19 PM
Share

सरकारने वित्त आणि महसूल सचिव तुहिन कांता पांडे यांची बाजार नियामक SEBI च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते माधवी पुरी बुच यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. कार्मिक, लोक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे आयएएस अधिकारी पांडे यांची भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

कोण आहेत तुहिन पांडे?

तुहिन कांता पांडे यांनी मोदी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. तुहिन पांडे हे यापूर्वी दीपम (डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट) चे सचिव होते, परंतु अली रझा रिझवी यांच्या निवृत्तीनंतर त्यांना डीपीई (डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्रायजेस) ची नोकरी देण्यात आली. त्यानंतर त्यांची अर्थ मंत्रालयात अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पगार किती मिळणार?

SEBI चे प्रमुख पद हे अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे काम आहे. कारण त्यांना आता शेअर बाजारावर देखरेख ठेवावी लागणार आहे. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारीही त्यांची असेल. बाजारात मोठी घसरण होत असताना आणि गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान होत असताना तुहिन पांडे यांना सेबीचे प्रमुख करण्यात आले आहे. तुहिन पांडेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या कामासाठी आपल्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर तुहिन पांडे यांना SEBI प्रमुखांसाठी भारत सरकारच्या सचिवांइतके वेतन मिळणार आहे. घर आणि कारशिवाय हा पगार दरमहा 5,62,500 रुपये आहे.

LIC कनेक्शन

एअर इंडियाचे खासगीकरण, नीलांचल इस्पात आणि LIC च्या आयपीओमध्ये ओडिशाचे रहिवासी असलेल्या तुहिन पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2021 मध्ये त्यांनी काही काळ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिले. याच काळात TATA समूहाला एअर इंडिया विकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

परदेशात शिक्षण

पांडे यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी परदेशातील बर्मिंगहॅम विद्यापीठातून MBA केले. बाजाराची घसरण सुरू असल्याने SEBI च्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याने आज आणि पुढे बाजारात अनेक बदल पाहायला मिळू शकतात. बाजारातील स्थैर्य राखणे, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणे आणि नियमांचे पालन करणे हे त्यांच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.