AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार

India-Canda : शेजारी नसलेल्या कॅनडाशी भारताचे संबंध आता टोकाचे ताणल्या गेले आहेत. या वादाचा परिणाम थेट भारतीयांच्या किचन बजेटवर पडणार आहे. कॅनडाचे जसे नुकसान होईल, तसे भारताचे पण नुकसान होईल, असा बसू शकतो फटका..

India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार
| Updated on: Sep 21, 2023 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारत कॅनडामधील वाद (India Canda Crisis) शमण्याची चिन्हे दिसत नाही. कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरमाईचे सूर आळवले असले तरी वाद संपलेला नाही. खलिस्तानवाद्यांसाठी आश्रू गाळणाऱ्या पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांच्याविरोधात भारतात संतापाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी राजदूत परत पाठवले आहेत. नवीन व्यापारी धोरणे थंडबस्त्यात पडली आहे. दोन्ही देशांमधील वादाने टोक गाठले आहे. भारत आणि कॅनडामध्ये यावर्षी 2023 मध्ये जवळपास 8 अब्ज डॉलर म्हणजे 67 हजार कोटींचा व्यापार झाला आहे. जर परिस्थिती आणखी चिघळली तर 67 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचा परिणाम थेट किचन बजेटवर होणार आहे.

असा दिसेल परिणाम

सर्वसामान्य भारतीयांच्या आहारात डाळींना खूप महत्व आहे. भारत-कॅनडामध्ये तणाव वाढल्याने डाळीच्या आयातीवर त्याचा परिणाम होईल. भारत कॅनडातून मसूर डाळ सर्वाधिक आयात करतो. राजकीय संबंध ताणल्याचे परिणाम व्यापारी संबंधावर दिसून येतील. डाळीच आयात रोडावू शकते. देशात सर्वसामान्य महागाईने मेटाकूटीला आला असताना हे नवीन संकट त्याला फटका देईल.

असे बिघडेल किचन बजेट

भारत कॅनाडातून मोठ्या प्रमाणात मसूर डाळ आयात करतो. 2022-23 या कालावधीत देशात एकूण 8.58 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली होती. या जून तिमाहीत आतापर्यत जवळपास 3 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली आहे. जर वाद लवकर मिटला नाही तर आयात थांबेल, मसूर डाळ पण महागेल. पचणास हलकी म्हणून या डाळीचा मोठा वापर होतो.

मसूर डाळीचे वाढू शकतात भाव

भारत-कॅनडा वाद लांबला तर डाळीच्या आयातीवर निर्बंध येऊ शकतात. डाळीचा पुरवठा रोडावू शकतो. मसूर डाळीची आवक सर्वाधिक प्रभावित होईल. देशात पुरवठा कमी झाल्यास अथवा काळाबाजार झाल्यास डाळीच्या किंमती भडकू शकतात. केंद्र सरकारने डाळीच्या महागाईवर तोडगा काढला आहे. डाळीची आयात वाढविण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. पण या नवीन वादाने डोके वर काढल्याने मसूरसह इतर डाळीच्या आयतीवर परिणाम दिसू शकतो.

Follow Us
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा