
देशातील जनतेसाठी सरकारकडून विविध बचत योजना राबविल्या जात आहेत, जेणेकरून लोक स्वतःसाठी चांगला निधी गोळा करू शकतील आणि त्याचबरोबर स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करू शकतील. या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) सारख्या अनेक योजनांचा समावेश आहे.
वास्तविक, सरकारने काल म्हणजेच 30 जून रोजी या योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला असून, त्यानंतर सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया. 30 जून रोजी झालेल्या आढाव्यात सरकारने या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही, म्हणजेच पीपीएफ, एसएसवाय, एनएससी सारख्या योजनांमध्ये लोकांना अजूनही पूर्वीप्रमाणेच व्याजदराने परतावा मिळणार आहे.
सरकार दर तिमाहीला या बचत योजनांच्या व्याजदराचा आढावा घेते. अशा परिस्थितीत आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (जुलै-सप्टेंबर 2025) सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) – 7.1% वार्षिक व्याज दर
सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) – 8.2% व्याज दर
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) – 8.2% व्याज दर
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) – 7.7% व्याज दर
पोस्ट ऑफिस एफडी – 6.9% व्याज ते 7.5% व्याज
किसान विकास पत्र (केव्हीपी) – 7.5% व्याज दर
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी थोडी फार गुंतवणूक करून चांगला फंड गोळा करू शकता. पीपीएफ योजनेत वार्षिक 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्षांचा आहे. तर या योजनेत तुम्हाला 7.1 टक्के परतावा मिळतो. जर तुम्ही या योजनेत दरमहा 500 रुपये म्हणजेच 15 वर्षांसाठी वर्षभरात 6000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 1,62,728 रुपये मिळतील. येथे तुम्ही एकूण 90,000 रुपयांची गुंतवणूक कराल. यामध्ये तुम्हाला जवळपास 72,000 रुपयांचा नफा मिळेल.
पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये तुम्ही तुमची गुंतवणूक दरमहा 500 रुपयांपासून सुरू करू शकता. या योजनेत तुम्हाला 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. आरडी योजनेचे व्याजदर 6.7 टक्के आहेत. यामध्ये तुम्ही 5 वर्षात एकूण 30,000 रुपयांची गुंतवणूक कराल, त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 35,681 रुपये मिळतील.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)