AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांसाठी LIC ची खास योजना, फक्त 100 रुपयांत होईल 75 हजारांचा फायदा

या योजना आणि योजनांचा उद्देश गरीबांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. गरीब लोकांचे हित लक्षात घेऊन जीवन विमा महामंडळाने आम आदमी विमा योजना सुरू केली.

सर्वसामान्यांसाठी LIC ची खास योजना, फक्त 100 रुपयांत होईल 75 हजारांचा फायदा
| Edited By: | Updated on: Mar 15, 2021 | 1:52 PM
Share

नवी दिल्ली : भारत सरकारने गरिबांसाठी अनेक सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत. या योजना आणि योजनांचा उद्देश गरीबांच्या जीवनात समृद्धी आणणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. गरीब लोकांचे हित लक्षात घेऊन जीवन विमा महामंडळाने आम आदमी विमा योजना सुरू केली. या कार्यक्रमांतर्गत विमाधारकास बरेच फायदे मिळतात. तुम्हीही विमा पॉलिसी घेण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. (lic policy aam admi bima yojana provides up to 75000 insurance cover just in 100 rupees premium)

एलआयसी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आम आदमी बीमा योजना (Aam Aadmi Bima Yojana) नावाची सामाजिक सुरक्षा पॉलिसी चालवण्याचे काम करते. आम आदमी विमा योजनेबद्दल बोलायचे झाल्यास ही पॉलिसी एलआयसीद्वारे चालवली जाते. ही योजना भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाद्वारे राबविली जाते. जीवन विमा संरक्षणातील फायद्यांव्यतिरिक्त, राज्यातील ग्रामीण भूमिहीन कुटुंबाच्या प्रमुखांना आंशिक आणि कायमस्वरूपी अपंगत्व किंवा कुटुंबातील एखाद्या कमावत्या सदस्याला या योजनेंतर्गत फायदा मिळतो.

पॉलिसीत गुंतवणुकासाठी पात्रतेची माहिती

या विमा योजनेच्या पात्रतेबद्दल बोलताना अर्जदाराचे वय 18 ते 59 वर्षे असावे. अर्जदार कुटुंबाचा प्रमुख असो वा नसो, कुटुंबातील कमाई करणारा सदस्य/दारिद्र्य रेषेखालील/दारिद्र्य रेषेच्या वरचा, जो शहरात राहतो, पण त्याला शहरी भागाची ओळखपत्र मिळत नाही. तो ग्रामीण भूमिहीन असावा, असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे

एलआयसीनुसार आम आदमी विमा योजनेत सामील होण्यासाठी आपल्याकडे रेशनकार्ड, जन्म दाखला, शाळेच्या दाखलाचा पुरावा, मतदार ओळखपत्र, सरकारी खात्याने दिलेली ओळखपत्र, आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

विमा योजनेच्या फायद्यांविषयी जाणून घ्या…

– जर AABY अंतर्गत विमा संरक्षण कालावधीत सदस्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्यावेळेस लागू असलेल्या विमा योजनेत नामनिर्देशित व्यक्तीला 30,000 रुपये दिले जातील.

– नोंदणीकृत व्यक्तीचा अपघातामुळे किंवा अपंगत्वामुळे मृत्यू झाल्यास पॉलिसीनुसार नामनिर्देशित व्यक्तीला 75,000 रुपये रक्कम दिली जाईल.

– अपंगत्व आल्यास पॉलिसीधारक किंवा नामनिर्देशित व्यक्तीला 37,500 रुपये दिले जातील.

– शिष्यवृत्ती लाभांतर्गत या विमा योजनेच्या 9 वी ते 12 वीदरम्यान शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना लाभ मिळतो. त्यांना दर मुलाला 100 रुपये दराने शिष्यवृत्ती दिली जाते. ते अर्ध-वार्षिक दिले जाईल.

प्रीमियमची किंमत

30,000 च्या विम्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे प्रीमियम प्रति वर्ष 200 रुपये घेतले जाते. यामध्ये 50 टक्के सुरक्षा निधी राज्य सरकार वा केंद्रशासित प्रदेश पुरवितो. तर इतर व्यावसायिक गटाच्या बाबतीत, उर्वरित 50 टक्के प्रीमियम नोडल एजन्सी/सदस्य/राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश पुरवले जातात. (lic policy aam admi bima yojana provides up to 75000 insurance cover just in 100 rupees premium)

संबंधित बातम्या – 

10 दिवसांत 1 लाखाचे झाले 1.85 लाख, ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल

Gold latest price : पुन्हा वाढले सोन्या-चांदीचे भाव, वाचा आजचे ताजे दर

उन्हाळ्यात AC खरेदी करायची असेल तर ‘इथे’ आहे धमाकेदार ऑफर, आताच करा बुकिंग

(lic policy aam admi bima yojana provides up to 75000 insurance cover just in 100 rupees premium)

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.