AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्सकडून तेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय अखेर मागे, जाणून घ्या कारण

कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, भागीदार सौदी अरामकोसोबत मिळून बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रिलायन्सच्या वतीने असे सांगण्यात आले की, जर नवीन कंपनी स्थापन झाली, तर तिला सौदी अरामकोला हिस्सा विकावा लागेल.

रिलायन्सकडून तेल व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय अखेर मागे, जाणून घ्या कारण
मुकेश अंबानी
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 20, 2021 | 9:27 PM
Share

नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजपासून O2C व्यवसाय वेगळे करण्याचे आवाहन केले होते, तो निर्णय रिलायन्स इंडस्ट्रीजने मागे घेतला. रिलायन्सनं तेल ते केमिकल व्यवसाय वेगळे करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने एनसीएलटीसमोर अर्ज दाखल केला होता, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय

कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, भागीदार सौदी अरामकोसोबत मिळून बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा O2C व्यवसायाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रिलायन्सच्या वतीने असे सांगण्यात आले की, जर नवीन कंपनी स्थापन झाली, तर तिला सौदी अरामकोला हिस्सा विकावा लागेल. अरामकोसोबत भारतात गुंतवणूक करण्यास ते नेहमीच उत्सुक असतील, असंही आरआयएलने सांगितले.

सौदी अरेबियात गुंतवणूक करणार

सौदी अरेबियातील गुंतवणुकीसाठी सरकारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनीला सहकार्य करणार असल्याचेही रिलायन्सने सांगितले. रिलायन्सने जारी केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीत रिलायन्स आणि सौदी अरामको यांनी मिळून निर्णय घेतला आहे की, O2C व्यवसाय RIL पासून वेगळा केला जाणार नाही.

रिलायन्स 20 टक्के हिस्सा अरामकोला विकणार

रिलायन्सकडे जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने सौदी आरामकोसोबत $15 अब्जचा करार केला. सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार आहे. या करारांतर्गत रिलायन्स ऑइल ते केमिकल व्यवसायातील 20 टक्के हिस्सा अरामकोला विकणार आहे. हा करार मार्च 2020 पर्यंत पूर्ण व्हायला हवा होता, पण कोरोनामुळे त्याला विलंब झाला.

अरामकोच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती

या वर्षी जूनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सौदी अरामकोचे प्रमुख यासिर ओथमान अल-रुमायान यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. अरामकोसोबतचा करार यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

पुढील वर्षी विम्याचा हप्ता 40 टक्क्यांनी वाढणार, कारण काय?

EPFO चा मोठा निर्णय, जमा पैशांपैकी 5% ‘या’ फंडात गुंतवले जाणार, फायदा काय होणार?

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप