AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !

आरोग्याच्या बाबतीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की, 137 टक्क्यांच्या वाढीसह 2 लाख 32 हजार कोटींचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे.

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !
| Edited By: | Updated on: Feb 02, 2021 | 8:02 AM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना योगगुरू बाबा रामदेव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात पाम तेलाचे उत्पादन वाढताच पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल अशी घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे. ते म्हणाले की, आरोग्याच्या बाबतीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की, 137 टक्क्यांच्या वाढीसह 2 लाख 32 हजार कोटींचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. (union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

पायाभूत सुविधांमुळे देशाची गती विकासाला मिळते. यंदाचं अर्थसंकल्प खेड्यातील आणि दुर्गम भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते जल जीवन अभियान असो किंवा शेतकऱ्यांसंबंधी बजेट असो सरकारने प्रत्येक दिशेने विचार केला आहे. हे बजेट सर्वसमावेशक आहे. सरकार जनतेसाठी नक्कीच काही पावलं उचलणार असल्याचंही यावेळी रामदेव बाबा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकार स्वावलंबी भारत तयार करण्यासाठी पावलं उचलत आहे. आयात शुल्कापासून ते खाद्यतेलापर्यंत उत्पादन वाढवून लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याचं मोदी सरकारचं स्पप्न आहे. आजपर्यंत मी जवळपास पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. आणि येणार्‍या काळात इंडोनेशिया आणि मलेशियामधून होणाऱ्या व्यवसायामुळे आणखी नफा झाल्यास भारतातील उत्पादन वाढेल. त्यामुळे तेव्हा भारताला दोन लाख कोटी रुपयांची बचत होईल. इतकंच नाही तर पतंजलीच्या माध्यमातून स्वत: स्वामी रामदेव जवळपास पाच लाख लोकांना नोकरी देतील असं त्यांनी म्हटलं आहे.

या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काहीतरी देण्यात आल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, देशात आयात शुल्क, उत्पादन आणि विविध खाद्यतेल व इतर वस्तूंचे उत्पादन वाढल्यास देश स्वावलंबी होईल. यामुळे मोदीजींचे देशात मॅन्युफॅक्चरिंग हब बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल, त्यामुळे अनेकांना त्यातून रोजगार मिळेल. (union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

संबंधित बातम्या – 

‘या’ विशेष गवताची करा लागवड; कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण योजना

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं का? वाचा आजचे दर

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

(union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत