रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !

| Updated on: Mar 08, 2023 | 10:10 AM

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रासोबत तलावात अंघोळीसाठी गेला. मात्र ही अंघोळ त्याची शेवटची ठरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी तलावात बुडाला.

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !
तलावात पोहायला गेलेला विद्यार्थी पाण्यात बुडाला
Image Credit source: TV9
Follow us on

भंडारा / तेजस मोहतुरे : रंगपंचमी खेळल्यानंतर गावातील चार मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी सर्वजण अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी पाण्यात बुडाला. मित्रांसोबतची ही रंगपंचमी त्याची अखेरची ठरली. चैतन्य राजेश मुटकुरे असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. चैतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंगपंचमी खेळल्यानंतर सर्व मित्र अंघोळीला गेले

मयत चैतन्य हा उज्वल विद्यालय येथे दहावीत शिक्षण घेत होता. रंगपंचमी खेळून गावातील तलावावर चार ते पाच मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला होता. चैतन्य याने तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात आंघोळीसाठी उतरला. सोबत चार मित्रही पाण्यात उतरले. चैतन्य हा खोलपाण्यात गेला. पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला.

मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली. घटनेची पोलिसांना देण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकालाही पाचारण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सणाच्या दिवशीच गावावर शोककळा

आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत मृतहाचा शोध सुरू केला. सर्च मोहिम राबवत काही तासातच मृतदेह बाहेर काढण्यात आला. चैतन्य हा सर्वाचा लाडका असल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता लाखनी येथे पाठविण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशीच घटना घडल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे.