पतीने मटण आणले नाही म्हणून वाद झाला, मग मुलांसमोरच पत्नीला…

| Updated on: Mar 30, 2023 | 4:00 PM

पतीने पत्नीला मटण आणण्यास सांगितले होते. मात्र पत्नीने ऐकले नाही. पती रात्री घरी जेवायला आल्यानंतर मटणावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् भयंकर घटना घडली.

पतीने मटण आणले नाही म्हणून वाद झाला, मग मुलांसमोरच पत्नीला...
जमिनीच्या वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

अलीगढ : पतीने मटण आणले नाही म्हणून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती तेथून पळून चालला होता. मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. देहलीगेट येथील ममुद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सगीर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.

पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे

कासगंजच्या ढोलना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भामो गावात राहणाऱ्या सगीर खानचे 10 वर्षांपूर्वी रोरावार पोलीस ठाण्याच्या कासगंज भागातील गुड्डोशी लग्न झाले होते. दोघांना तीन मुली आहेत. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. याच वादातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती.

रविवारी मटणावरुन झालेला वाद टोकाला गेला

गुड्डोने रविवारी रात्री सगीरला मटण आणण्यास सांगितले होते. सगीरने मटण आणले नाही. रविवारी रात्री सगीर नमाज अदा करुन 10.30 वाजण्याच्या सुमारास घरी आला. घरी आल्यानंतर सगीरने मटण आणले नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर त्याने पत्नीकडे चपाती मागितली तर तिने स्वतः उठून घेण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

यानंतर सगीरला संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी मुलींचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. शेजाऱ्यांना पाहून सगीर पळून चालला होता. पण लोकांनी पाठलाग करुन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.