AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये ट्रक लॉरीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू

गुर्जलाचे डीएसपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना गंभीर दुखापत झाली आहे.

Andra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये ट्रक लॉरीमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू
ट्रक लॉरीमध्ये भीषण अपघातImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 30, 2022 | 12:32 PM
Share

नवी दिल्लीआंध्र प्रदेशमध्ये (Andra pradesh) भीषण रस्ता अपघात झाला आहे. राज्यातील पालनाडू (palnadu) जिल्ह्यात ट्रक आणि पार्क केलेल्या लॉरीमध्ये भीषण टक्कर झाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना नरसरावपेठ येथील गुर्जला शासकीय रुग्णालयात (government hospital) दाखल करण्यात आले आहे. गुर्जलाचे डीएसपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना गंभीर दुखापत झाली आहे.

गुर्जला पोलिस उपअधीक्षकांनी अपघाताची माहिती दिली

गुर्जलाचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) जयराम यांनी सांगितले की, ट्रक श्रीशैलमहून येत होता. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये 39 प्रवासी होते. पालनाडू जिल्ह्यात हा भीषण अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना नरसरावपेठ येथील गुर्जला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

 अनेकजण गंभीर जखमी 

जखमी झालेल्यामध्ये अधिकजण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकड़ा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर घटनास्थळावरची सगळी माहिती पोलिसांनी घेतली आहे.

“आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर सांगितले, “आम्ही अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चांगल्या उपचारासाठी गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत अशी विनंती केली आहे. रात्रीच्यावेळेस असे अपघात होत असतात. अनेकदा चालकाला झोप लागल्याने असे अपघात झाले आहेत. पण रात्री झालेला अपघात अत्यंत भीषण होता.

त्यामुळे अवघ्या जिल्ह्यात अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घेण्यात आले आहेत. नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात मोठी गर्दी केली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....