AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या

मोर्चा दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे यांच्या मध्यस्थीने काही प्रमुख आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी गेले आहेत.

मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Dec 06, 2022 | 12:41 PM
Share

चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्थनग्न पायी मोर्चा काढला आहे. मंगळवारी सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबड परिसरात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. खून, दरोडे, धारदार शस्त्राने हल्ले, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हेगारीच्या घटना या परिसरात सर्रासपणे घडत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अंबड पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठं असल्याने, या भागात स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी नागरिकांनी या अगोदर आमदार, पोलीस आयुक्त तसेच पालकमंत्री दादा भुसे यांना देखील निवेदन दिले आणि वेळोवेळी आंदोलन देखील केले. मात्र या मागणीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अंबड परीसरातील नागरिक आक्रमक झाले आहे.

अतिरिक्त पोलीस स्टेशनचा प्रश्न मंत्रालय दरबारी नेण्यासाठी आपण अर्धनग्न होऊन नाशिक ते मुंबई मोर्चा काढल्याचे आंदोलकांनी सांगितले.

मोर्चा दरम्यान नाशिक पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे यांच्या मध्यस्थीने काही प्रमुख आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांना भेटण्यासाठी गेले आहेत.

मात्र जोपर्यंत लेखी स्वरुपात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.

काही आंदोलनकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठकीसाठी गेले असले तरी काही आंदोलन मात्र मुंबईच्या दिशेने जात आहे.

चुंचाळे आणि एमआयडीसी क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतात्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. त्यात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्द मोठी आहे.

एकूणच पोलीस स्टेशनच्या मागणीसाठी निवेदन देणे, आंदोलन करणे, लोकप्रतिनिधींना साकडे घालणे अशा विविध मार्गाने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीला यश येते का ? आंदोलक नागरिक काय भूमिका घेतात ? याकडे अंबडच्या पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....